Friday 2 January 2015

शहीदे आलम भगतसिंग

२३ मार्च १९३१ रोजी भगतसिंग लाहोरच्या तुरुंगात हसत हसत फासावर गेले.
जाताना त्यांचे वय अवघे २३ वर्षांचे होते. भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून अनेकानी हौतात्म पत्करले. अनेक वीर शहीद झाले.
तय सर्वानाच इतिहासात एक मानाचे स्थान आहे.
पण तय सशस्त्र क्रांतिकारकांतही भगतसिंग यांचे स्थान अद्वितीय आहे. म्हणुनच त्यांना 'शहीदे आलम' असा किताब दिला जातो.
भगतसिंग यांच्यापुर्वीच्या क्रांतिकारकांना भारताचे स्वातंत्र्य हवे होते.
भगतसिंग यांना स्वातंत्र्य हवे होतेच, पण स्वातंत्र्यसमवेत भारतीय जीवनात क्रांती हवी होती.
स्वतंत्र्य भारतातील आर्थिक-सामाजिक-राजकीय रचनेचे सुस्पष्ट उद्दिष्ट त्यांनीच सशस्त्र क्रांतिकारकांना दिले.
समाजवादी स्वतंत्र्य भारताची उभारणी करण्यासाठी ते लढले.
'इन्कलाब झिंदाबाद' ही घोषणाही त्यांनीच आंदोलनाला दिली.
क्रांतिसाठी सबंध भारतातील क्रांतिकारकांना त्यांनी एकत्र केले व स्वतः अग्रभागी राहून कृती केली.
जनआंदोलनाशी सशस्त्र क्रांतीचा सांधा जुळविला.
जनआंदोलनाला महत्त्व दिले.
म्हणून सर्वार्थाने ते 'शहीदे आलम' ठरले

No comments:

Post a Comment