Monday 12 January 2015

घरात चांगले संस्कार व्हावे

घरात चांगले संस्कार व्हावे असे मी वारंवार सांगत असतो कारण जिवनात तेच सगळ्यात महत्वाचे असते. स्वराज्य हे एका दिवसात तयार झाले नाही.शहाजी राजांनी कित्येक दिवस उराशी स्वप्न बाळगले ते साकार होण्यासाठी शिवाजी राजांना तसे घडवले.उदा:बार मावळ एकत्र करणारे कान्होजी जेधे,शिवरायांचे गुरु बाजी पासलकर आदी शहाजी राजांच्या सेवेत असणारी मंडळी त्यांनी शिवबाच्या दिमतीस पुण्यास धाडुन दिली.
तोरणा किल्ल्यावर धनाचे सात हंडे सापडले ही कथा आपण ऐकतो.पण हे हंडे सापडणे हा योगायोग न्हवता.सोनाजी डबीर यांच्या मार्फ़त शहाजी राजांनी खेळलेले ते राजकारण होते.पुढे शिवछत्रपतिंनी संभाजी राजांना घडवताना योग्य ते संस्कार केले म्हणुन एका सिंहाच्या पोटी छावा तयार झाला. आग्र्याहुन सुटकेची ब्लु प्रिंट संभाजी राजांनी तयार केली वयाच्या नवव्या वर्षी. असे मानन्यास पुरावे आहेत कारण शिवाजी राजे महालातुन बाहेर जाऊ शकत न्हवते जाउ शकत होता तो छोटा संभाजी.या छोट्या संभाजीने कुठुन कसे जायचे,कुठल्या दिशेला जायचे याचा आराखडा राजांना सादर केला.
शिवाजी राजांना दुभाष्याची गरज पडत असे परंतु संभाजी राजे १६ भाषा बोलत असत.त्याकाळातील इंग्रज गवर्नर यामुळे आश्चर्य चकित झाले तसे त्यांनी आपल्या डायरित नमुद करुन ठेवले आहे.संभाजी राजांना कलेतसुद्धा फ़ार रस होता,भरतनाट्यम, कथकली आदी त्याकाळात लोप पावु शकणाऱ्या कलांना नवसंजिवनी दिली ती संभाजी राजांनी,तत्कालि न स्वराज्य बेंगरुळु आदीपर्यंत होते हे लक्षात घ्यावे.
शिवछत्रपतिंनी त्या त्या कलेतील जाणकार मंडळींकडुन संभाजी राजांना ज्ञान मिळण्याची व्यवस्था केली.
जगातिल पहिले बुलेटप्रुफ़ जॅकेट संभाजी राजांनी त्रीचीनापल्लीचा चीक्क्देव राजाचा किल्ला घेताना तयार केले.कातड्यापास ुन तयार केलेल्या चिलखतावर तेल चोपडले ज्यामुळे शत्रु सैन्याच्या बाणांचा मारा निष्फ़ळ ठरला.ही युद्धकला,राजकार ण संभाजीराजांनी"बुधभुषणम"या ग्रंथात वयाच्या १४ वर्षी लिहिली.
काशीचे धर्ममार्तंड"गागाभट्ट"यांनी लिहिलेला"राज्याभिषेक"हा ग्रंथ १४ वर्षांच्या संभाजीला गुरु मानुन अर्पण केला.म्हणजे अखिल मराठी साम्राज्यात त्यांना अर्पण करावासा वाटलेला एकमेव पडीत संभाजी महाराज होते म्हणजे संभाजी राजांचे पांडित्य किती असेल?
पण इथे सर्व मुळ काय आहे तर शहाजी ते संभाजी वगैरे पर्यंत सर्वांनी लक्षपुर्वक धेय समोर ठेवुन घडण केली.तुम्ही तुमच्या मुलांना काय संस्कार देताय हे महत्वाचे आहे.त्यामुळे खुप सारी पैशाची डबोली तुम्ही ठेव शकाल परंतु संस्कार मात्र तुम्हालाच द्यावे लागतील ते विकत मिळणार नाहित एवढं लक्षात असु द्या.

Friday 2 January 2015

वेडात मराठे वीर दौडले सात !!!

२५ फेब्रुवारी १६७४ महाशिवरात्रीचा दिवशी घडलेला इतिहास :
बहलोलखान स्वराज्यात धुमाकूळ घालत होता. त्याने स्वराज्याच्या रयतेवर अनन्वित अत्याचार केले. महाराजांनी प्रतापरावांना बहलोलखानास धुळीस मिळवा असा आदेश दिला. मराठ्यांच्या गनीमीकाव्याने प्रतापरावांनी खानाला डोंगरदरीत पकडून जेरीस आणले. वेळ प्रसंग पाहून बहलोलखान शरण आला आणि हा रांगडा शिपाईगडी मेहेरबान झाला. युद्धात शरण आलेल्याला मारू नये असा प्रतापरावांचा शिपाईधर्म सांगत होता. प्रतापरावांनी त्याला धर्मवाट दिली. तो जीव वाचवून गेला.
शिवाजी महाराजांना खबर पोहोचली, “प्रतापरावांनी बहलोलखानाला सोडला!” आपल्या रयतेचे हाल करणारा बहलोलखान जिवंत जातो याचा महाराजांना राग आला. त्यांनी एक खरमरीत पत्र पाठवून प्रतापरावांची कान उघाडणी केली. त्या पत्रात एक वाक्य असं होतं की, "बहलोलखानाला मारल्याशिवाय आम्हाला रायगडी तोंड दाखवू नका ". त्याकाळी मावळ्यांचा शिवाजीमहाराजांवर असलेला जीव पाहता ही किती भयंकर शिक्षा सुनावल्या गेली होती हे लक्षात येईल.
महाराजांना तोंड दाखवायचं नाही तर मग जगायचं कशासाठी? हा एकच प्रश्न प्रतापरावांना दिवसरात्र सातावीत होता. जीवाची तगमग होत होती. सैन्य घेऊन बहलोलखानाच्या मागावर निघाले. सर्वत्र जासूद पाठवले. माग काढा ! फक्त माग काढा आणि सांगा कुठे आहे तो गनीम . त्याला मारल्याशिवाय महाराजांना तोंड दाखवता येणार नाही.
अशातच एके ठिकाणी सैन्याचा तळ पडलेला होता. मन रमत नाही म्हणून जवळचे सहा सरदार घेऊन प्रतापराव शिकारीला निघाले. काही मैल गेल्या नंतर त्यांच्या हेरांनी बातमी आणली की बहलोलखान जवळच आहे. जवळ म्हणजे कोठे? तर हा समोरचा डोंगर ओलांडला की छावणी आहे.
बस! प्रतापरावांना राग अनावर झाला. त्या हेराला त्यांनी तसाच छावणीत पाठवला सैन्याला स्वारीचे आदेश दिला. पण… पण… सैन्य येई पर्यंत प्रतापरावांना थांबवल्या गेलं नाही. त्यांच्या मूळच्या शिपाई स्वभावाला धीर धरता आला नाही आणि त्यांनी आपल्या सरदारांना चढाईचा आदेश दिला.
अवघे सात मराठे सुमारे पंधरा हजारच्या सैन्यावर चढाई करतात. यात काय नाही? दुर्दम्य विश्वास , पराकोटीची स्वामीनिष्ठा सारं – सारं काही ! प्रतापरावंचं ठीक पण त्या सहांपैकी एकाचे ही पाय अडखळले नाहीत. केवळ मरणावर चालून गेलेले ते सात वीर हे मराठी इतिहासातील एक स्वर्णीम पराक्रम पर्व आहे.
........................................................
""दगडात दिसतील अजुन्बी तेथल्या टाचा ,
'ओढ्यात तरंगे अजुनी रंग रक्ताचा ।।'
'क्षितिजावर उठतो अजुन्बी मेघ मातीचा,
'अद्याप विराणी कुणी वाऱ्यावर गात ।।'
"वेडात मराठे वीर दौडले सात !!!"
प्रतापराव आणि सोबतचे सहा सरदार यांना वीरमरण आले. महाराजांना अतीव दु:ख झाले. स्वराज्याची अपरिमित हानी झाली.
सर सेनापती प्रतापराव गुर्जर व त्यांच्या सहा साथीदारांना मानाचा मुजरा !!!

विशाळगड

विशाळगड
शिवकालीन इतिहासामधे विशाळगडाला महत्त्वाचे स्थान मिळालेले आहे. इतिहासामधे विशाळगड, खेळणा, खिलगिला, खिलकिला, सक्करलाना अशी वेगवेगळी नावे या किल्ल्याला मिळालेली आहेत. देश आणि कोकण यांना जोडणार्‍या आंबा घाटा जवळ असलेला विशाळगड सह्रयाद्रीच्या मुख्य रांगेला लागूनच आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यामधे विशाळगड आहे. मलकापूरकडून अथवा आंबा गावा कडून असे दोन गाडीमार्ग गजापूर मार्गे विशाळगडाला जातात. आंबा घाटाच्या पायथ्याशी असलेल्या साखरपा गावाकडून तीन तासाच्या चढाईने माचाळच्या गुहेकडून आपण विशाळगडावर पोहोचू शकतो.
सह्याद्रीच्या रांगेशी लहानशा खिंडीने जोडलेला विशाळगड समुद्र सपाटीपासून १०२१ मीटर उंचीचा आहे. या खिंडीपर्यंत गाडीरस्ता असल्यामुळे अर्ध्यातासात विशाळगडावर पोहोचता येते. विस्तृतमाथा असलेला विशाळगड सह्याद्रीच्या पाताळवेरी दर्‍यांनी वेढलेला असल्यामुळे बेलाग झालेला आहे.
विशाळगडाच्या बेलागपणाचे येथिल दर्‍याखोर्‍यांचे निबीड अरण्याचे सुरेख वर्णन फेरीस्ता या इतिहासकाराने केलेले आहे. तो म्हणजो या घाटामधील वाटा अतिशय वाकडय़ा-तिकडय़ा आहेत. याची तुलना कुरळ्या केसांशी केली तरी यांची बरोबरी होणार नाही. या पर्वतांचे देखावेही अतिशय भयंकर असून याच्या कडय़ावर आणि गुहांजवळ आल्यावर प्रत्यक्षात भुते आणि राक्षस देखील दचकतील. या रानात सूर्याचा कवडसाही पडायचा नाही. इथे वाढलेले गवत सर्पाच्या सुळ्याप्रमाणे चिवट, तिक्ष्ण ! हवा अजगराच्या श्वासो श्वासासारखी दुर्गंधमय. इथल्या पाण्यामधे मूतिमंत मृतयूचेच वास्तव्य. वार्‍याची प्रत्येक झुळूक विषाने माखलेली अशा या वाकडय़ातिकडय़ा वाटांनी चालून मुसलमानी सैन्य अगदी भिऊन आणि थकून गेले!
विशाळगडाच्या परिसरात भटकंती केल्यास आजही याचा प्रत्यय आल्याशिवाय रहात नाही. विशाळगडाच्या या दुर्गमतेचा वापर करुन शत्रूला नामोहरण केल्याचा एक दाखलाही इतिहासात आहे. साधारण इ.स.१४५० च्या सुमारास बहमणी राज्याचा एक सुभेदार हा प्रांत काबीज करण्यासाठी आला. हा सरदार म्हणजे मलीक उत्तुजार होय त्याने प्रथम पन्हाळ्या किल्ल्यावरील शिर्क्यांना जेरीस आणले. शिर्क्यांनी मलीक उत्तुजाराला विशाळगडाचे आमिष दाखवले. शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली मलीक उत्तुजारची सात हजाराची फौज विशाळगडाच्या निबिड अरण्यात येऊन दाखल झाली. अतिशय अडचणीच्या जागेवर सैन्यासकट मलीक उत्तुजारला आणल्यावर विशाळगडावरील शंकरराव मोरे यांनी जोरदार हल्ला केला. शिर्के आणि मोरे यांनी कात्रीत सापडलेल्या मलीक उत्तुजारला सात हजार सैन्यासकट त्यांच्या आक्रमणापासून मुक्त केला. यासैन्यातील एक सरदार मलीक रैहान होता. त्याचीच कबर विशाळगडावर आहे असे जाणकारांचे मत आहे.
इ.स. १६६० मधे आदिलशाही सरदार सिद्धी जैहर याने शिवरायांना पन्हाळगडावर कोंडले होते. या कोंडीतून शिवराय चतुराईने निसटले. त्याचा पाठलाग करीत सिद्धी मसूद आला. त्या सिद्धी मसूदला थोपवण्याचा महान पराक्रम बाजीप्रभु यांनी केला. महाराज विशाळगडावर सुखरुप पोहोचले. या आणि अशा अनेक रोमहर्षक घटनांचा साक्षीदार विशाळगडाचा किल्ला आहे.
एस.टी.च्या थांब्यापासून अध्यातासात आपण विशाळगडावर पोहोचतो. गडावर मुंढा दरवाजा, रणमंडळ मलीक रैहानचा दर्गा, अमृतेश्वर मंदिर, दगडी कुंउ, पंतप्रतिनिधीचा वाडा अशा अनेक वास्तु गडावर पहायला मिळतात.
या शिवाय छत्रपती राजाराम महाराज यांच्या तृतीय पत्नी अंबीकाबाई यांचे स्मारक आणि इतिहासामधे आपल्या पराक्रमाने अजरामर झालेले वीर बाजीप्रभु आणि फुलाजी प्रभु यांच्या समाध्या आज उपेक्षीत असल्या तरी नमन करण्यायोग्य आहेत.
विशाळगड आणि त्याचा परिसर मुक्तपणे पहाण्यासाठी पुर्ण दिवसाचा वेळ हाताशी असायला हवा. येथे जेवणाची तसेच रहाण्याचीही व्यवस्था होऊ शकते.
-प्रा.नितीन बानुगडे - पाटील


स्वराज्यसंकल्पक शहाजीराजे भोसले

>>> .स्वराज्यसंकल्पक शहाजीराजे भोसले <<<
------------------<<>>----------------------
शहाजीराजे भोसले हे एक कर्तबगार सेनापती होती, शिवाजीच्या स्वराज्य स्थापनेसाठी त्यांचे मोलाचे सहकार्य होते, राजदरबारी नॊक्ररी असतानाही शहाजीनी तटस्थ भुमिका घेऊन अप्रत्यक्षपणे त्यांनी स्वराज्य स्थापनेला पाठिंबा दर्शवला.शहाजी मुस्तद्दी होते.विजापुरच्या बादशहाला ते शिवबाबद्दल असे सांगत की ’पोरगा माझे ऎकत नाही तुम्ही काय तो बदोबस्त करावा’ यावरुन शहाजीची ना उत्तेजन ना विरोध अशी भुमिका दिसुन येते.
शहाजी राजाना स्व:ताचे राज्य व्हावे अशी मनापासुन ईच्छा होती परंतु तेवढी कुवत त्यांच्यात निर्माण झाली नव्हती. शहाजीच्या स्वराज्य स्थापनेची ईच्छा जिजाऊनी शिवरायांच्या रुपानी साकार केले. जिजाऊनीं लहानपणा पासुनच शिवरायांवर योग्य संस्कार करुन शिवकल्याण राजा घडविला.
मालोजीचे लग्न फ़लटणचे देशमुख जगपालराव निंबाळकर यांची बहीण दिपाबाई हिच्याशी झाले होते.मालोजीस लवकर संतान होइना म्हणुन मालोजी व दिपाबाई यांना वाईट वाटत होते.त्यांनी नगरचा पिरशहा शरीफ़ यांस नवस केला.व त्याच्या अनुग्रहाने दिपाबाईला २ मार्च १५९५ ला पुत्रप्राप्ती झाली त्यांचे नाव शहाजी ठेवण्यात आले.पुढे १५९७ला दुसरा मुलगा झाला त्याचे नाव शरीफ़जी ठेवण्यात आले.मालोजी राजे व फ़लटणचे लखुजी जाधव यांच्या गाढ मॆत्री होती. त्यामुळे लखुजी जाधवांची कन्या जिजाऊ व मालोजी राजांचे पुत्र शहाजीराजे यांचा विवाह संपन्न झाला.शहाजी राजे भोसले व जाधव राव यांची कन्या जिजाबाई जा उभयांताचे लग्न इ स १६०५ मार्गशीष शुद्ध ५ शके १५२७, विस्ववासु नम संवत्सर फसली सन १०१५ या साली झाले.लग्नानंतर ५ वर्षानी मालोजी राजाचे इंदापुर नजीक रणभुमी वर देहवसान झाले.
शहाजींना तीन राण्या होत्या.जिजाबाई,तुकाबाई,नारसाबाई अशी त्यांची नावे होती.जिजाऊच्या पोटी संभाजी व शिवाजींनी जन्म घेतला.तर तुकाबाईच्या पोटी व्यंकोजीनीं जन्म घेतला.व्यंकोजीना शहाजीनी बेगलॊरच्या जहागिरीवर पाठवले तर शिवाजींना पुण्याच्या जहागिरीत ठेवले.शिवाजींच्या मोठ्या बंधुचे नाव संभाजी होते त्याला शहाजीनी स्वत:जवळ ठेवले. पुण्याच्या जहागिरीत कोणत्याही प्रकारे अडचण येऊ नये म्हणुन जिजाऊ व शिवराय यांच्या सोबत श्यामराज रांझेकर, बाळकृष्णपंत हणमंते, रघुनाथ बल्लाळ अत्रे, कान्होजी जेधे नाईक व यांच्याबरोबर इतर अनेक मातब्बरांना जय्यत तयारीनिशी राज्यकारभारासाठी पाठवले होते. व राज्यकारभारासाठीची आवश्यक राजमुद्राही शहाजीराजांनीच शिवरायांना दिली. अशा प्रकारे स्वराज्य स्थापनेस अनुकुल परिस्थिती शहाजीराजानी करुन दिली।
शहाजीराजे हे शुर सेनानी होते निजामशाहीत त्यांचे फ़ार वर्चस्व होते. शहाजीराजे स्वत: राजे बनु शकत होते परंतु तेवढी प्रबळता त्यांच्यात आली नव्ह्ती ही पुढील उदाहरणावरुन दिसुन येते,जेव्हा शहाजहान आणि मंहमद अदिलशहा यांनी निजामशाही संपवली त्यावेळी शहाजीनी निजामचा वारस असलेल्या मुर्तीझाला राजे केले. अहमदनगर जिल्हातील संगमनेर तालुक्यातील पेमगिरीच्या किल्ल्यावर ही घटना घडली.मुर्तीझाचे वय लहान असल्याने राज्यकारभाराची सर्व जबाबदारी ही शहाजी राज्यावर होती शहाजीनी तो राज्यकारभार पुढे ३ वर्षे चालवला
शहाजी हे राजकारणी पुरुष होते.विजापुरच्या पदरी असताना शहाजी राजांनी अनेक मोठमोठे विजय मिळवुन दिले.परंतु मराठा सरदारामधील हेवेदाव्यामुळे विजापुर दरबारात त्यांचा स्थांनास व प्रतिष्ठेत नेहमी चढऊतार होत असे.मुधोळच्या घोरपड्यांनी विजापुरच्या बादशहाचा गॆरसमज करुन दिला. आदिलशहाचा मुख्य वजीर नवाब मुस्तफाखान याने बाजी घोरपडे, मंबाजी भोसले, मंबाजी पवार, बाळाजी हैबतराव, फतहखान, आझमखान यांच्या साहाय्याने शहाजीराजांना दगा देऊन कर्नाटकातील जिंजीजवळ कैद केले.
शहाजीराजांची दि. १६ मे, १६४९ रोजी सन्मानपूर्वक सुटका झाली. शहाजीराजांच्या कारकीर्दीचा आढावा घेतला असता असे लक्षात येते की त्यांनी स्वाभिमान राखत आदिलशाही, मुघलशाही व निजामशाही - या सर्व सत्ताधीशांकडे काम केले. त्यांच्या कारकीर्दीचे महत्त्वाचे टप्पे पुढीलप्रमाणे,
इ। स. १६२५ ते १६२८ - आदिलशाही
इ. स. १६२८ ते १६२९ - निजामशाही
इ. स. १६३० ते १६३३ - मुघलशाही
इ.स. १६३३ ते १६३६ - निजामशाही
इ।स. १६३६ पासून पुढे - आदिलशाही
पुढे १६६१-६२ दरम्यान शहाजीराजे महाराष्ट्रात आले होते. त्यांनी त्यानंतरचा काही काळ शिवाजीराजे व जिजाबाईंसमवेत घालवला. आपण लावलेल्या स्वराज्याच्या रोपट्याचा आज विशाल वटवृक्ष झाल्याचे पाहून ते धन्य झाले. काही काळानंतर ते पुन्हा आपल्या जहागिरीत परतले. माघ शुद्ध ५, म्हणजेच २३ जानेवारी,१६६४ रोजी होदेगिरीच्या जंगलात शिकारीला गेले असताना त्यांच्या घोड्याचा एका वृक्षवेलीमध्ये पाय अडकला व ते खाली कोसळले आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

शहीदे आलम भगतसिंग

२३ मार्च १९३१ रोजी भगतसिंग लाहोरच्या तुरुंगात हसत हसत फासावर गेले.
जाताना त्यांचे वय अवघे २३ वर्षांचे होते. भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून अनेकानी हौतात्म पत्करले. अनेक वीर शहीद झाले.
तय सर्वानाच इतिहासात एक मानाचे स्थान आहे.
पण तय सशस्त्र क्रांतिकारकांतही भगतसिंग यांचे स्थान अद्वितीय आहे. म्हणुनच त्यांना 'शहीदे आलम' असा किताब दिला जातो.
भगतसिंग यांच्यापुर्वीच्या क्रांतिकारकांना भारताचे स्वातंत्र्य हवे होते.
भगतसिंग यांना स्वातंत्र्य हवे होतेच, पण स्वातंत्र्यसमवेत भारतीय जीवनात क्रांती हवी होती.
स्वतंत्र्य भारतातील आर्थिक-सामाजिक-राजकीय रचनेचे सुस्पष्ट उद्दिष्ट त्यांनीच सशस्त्र क्रांतिकारकांना दिले.
समाजवादी स्वतंत्र्य भारताची उभारणी करण्यासाठी ते लढले.
'इन्कलाब झिंदाबाद' ही घोषणाही त्यांनीच आंदोलनाला दिली.
क्रांतिसाठी सबंध भारतातील क्रांतिकारकांना त्यांनी एकत्र केले व स्वतः अग्रभागी राहून कृती केली.
जनआंदोलनाशी सशस्त्र क्रांतीचा सांधा जुळविला.
जनआंदोलनाला महत्त्व दिले.
म्हणून सर्वार्थाने ते 'शहीदे आलम' ठरले

झेंडा

"झेंडा"
स्वराज्य उभारणीचा शहाजीराजांचा मनसुबा फसला आणि ते विजापूरच्या आदिलशाहची चाकरी करू लागले. बंगळुर हे शहाजीराजांचे जहागिरीचे ठिकाण. जिजाबाईसाहेब आणि शहाजीराजांनी बंगळुरात काही मसलत करून बालशिवबाला महाराष्ट्रात पुणे मुक्कामी पाठविण्याचे योजिले. शहाजीराजांनी बालशिवबाला आपले काही निष्ठावान सरदार, हत्ती, घोडे खजिना व 'भगवा झेंडा' दिला. बालशिवबा जिजाबाईसाहेबांसमवेत बंगळुरहून पुण्याकडे निघाला.
पुण्याच्या कसबा गणपतीला वंदन करून आई तुळजाभवानीला साक्ष ठेवून बालशिवबाने मावळच्या दर्‍याखोर्‍यात स्वराज्याचा यज्ञ पेटविला! मुरुंबदेवाचा डोंगर (राजगड), तोरणा, कोंढाणा इ. समिधा यज्ञात पडल्या... आणि अलिआदिलशहाची झोप उडाली! प्रथम त्याने कपटाने शहाजीराजांना जिंजीजवळ पकडून अटकेत टाकले आणि आपल्या फत्तेखान नावाच्या सरदाराला प्रचंड फौजेनिशी स्वराज्यावर सोडले. सुभानमंगळ ताब्यात घेऊन फत्तेखान सासवडजवळील खळद-बेलसर या गावाजवळ तळ देऊन बसला. नुकतेच मिसरूड फुटलेले शिवाजीराजे पुरंदर किल्ल्यावरून युद्धाचे डावपेच आखू लागले. महाराजांच्या हुकमावरून मावळ्यांची एक तुकडी सुभानमंगळावर तुटून पडली. सुभानमंगळ फत्ते झाला. फत्तेखानाच्या सरदारांचा दारुण पराभव झाला. सुभानमंगळवर भगवा झेंडा फडकला! स्वराज्यासाठी लढती गेलेली ही पहिली लढाई! (8 ऑगस्ट 1648)
आत्ता पाळी होती फत्तेखानाची! पुरंदरावर जमलेल्या जिवलगांना महाराजांनी अपुला मनसुबा सांगितला. फत्तेखानाला गनिमी काव्याचा इंगा दाखवायचा. सगळ्यांनी आनंदानी माना डोलवल्या. पुरंदराहून फत्तेखानाच्या छावणीच्या दिशेने बिनीच्या तुकडीने कूच केले. तिच्यामागोमाग इतरही मावळे निघाले. सगळ्यात शेवटी निघाली भगव्या झेंड्याची तुकडी. या तुकडीत एका जवान मावळ्याच्या हाती भगवा झेंडा होता. या तुकडीत तगडे पन्नास-पंचावन्न आडदांड मावळे सामील झाले होते. पुरंदराहून हे वादळ फत्तेखानाच्या छावणीच्या रोखाने खळद-बेलसरकडे घोंघावत निघाले. भगवा झेंडा वार्‍यावर फडफडत होता!
मराठ्यांच्या तुकड्या बेलसरच्या परिसरात घुसल्या आणि इशारत होताच फत्तेखानाच्या छावणीवर तुटून पडल्या! खानाचे लष्कर लढाईस सज्ज झाले. भयंकर हाणामारी सुरू झाली. आपलं बळ कमी पडतंय हे जाणून मराठ्यांची बिनीची तुकडी हळूहळू काढता पाय घेऊ लागली. झेंड्याची तुकडी मात्र माघारी फिरली नव्हती. उलट त्या मर्दांनी शत्रूवर जोरदार हल्ला चढविला. खानाच्या सैन्याने झेंड्याच्या तुकडीला घेरले. गनिमांनी अगदी झेंड्यावरच गर्दी केली. झेंडा हेलकावू लागला. झेंडा पडला तर अब्रूच गेली. प्रत्येकजण झेंडा वाचविण्यासाठी शर्थ करू लागला. झेंडा धरलेल्या जवानाला गनिमांपैकी कोणाचा तरी इतक्या जोरात घाव बसला की तो स्वार घोड्यावरून खाली कोसळलाच. त्याच्या हातातला झेंडा निसटला. आता झेंडा जमिनीवर पडणार इतक्यात... एका तलवारबहाद्दराने झेंडा वरच्यावर पकडला. जखमीस्वाराला तशाच जलदगतीने दुसर्‍या एका घोड्यावर घेऊन झेंडा आपल्या हाती ठेवला आणि तुकडीला माघार घेण्याचा हुकूम केला. झेंडा हातात तोलीत त्या समशेरबहाद्दराने झेंड्याच्या तुकडीसह पुरंदराकडे कूच केले. झेंड्याभोवतीच्या गनिमांना कापून जमिनीवर पडणारा झेंडा हवेत वरचेवर झेलून मराठ्यांची अब्रू वाचवणार्‍या त्या समशेरबहाद्दराचे नाव होते बाजी जेधे! कान्होजी जेध्यांचा लेक!
प्रतापगड युद्धात मर्दुमकी गाजवणार्‍या कान्होजी जेंध्याचा पुत्र बाजी जेथे यास महाराजांनी त्याच्या अतुलनीय शौर्याबद्दल ‘सर्जेराव’ ही पदवी बहाल केली. बाजी जेध्यांचा झाला ‘बाजी सर्जेराव जेधे’! यानंतर पुरंदरच्या पायथ्याशी झालेल्या युद्धात फत्तेखानाचा दारुण पराभव झाला. महाराजांची अस्मानी फत्ते झाली! बाजी पासलकर, गोदाजी जगताप, भिकाजी चोर, कावजी, बाजी जेधे अशी मंडळी या युद्धात हिरीरीने लढली! (ऑगस्ट 1648)
पुण्याहून दिवेघाटातून सासवडकडे जाताना दिवेघाट ओलांडला की खळद आणि बेलसर ही गावे लागतात.  सासवडमध्ये बाजी पासलकर व गोदाजी जगताप यांची समाधीस्थाने आहेत.

गुढी पाडव्याबाबतीत पसरवण्यात येणारा गैरसमज चुकीचा - अखिल भारतीय मराठा महासंघ

गुढी पाडव्याबाबतीत पसरवण्यात येणारा गैरसमज चुकीचा - अखिल भारतीय मराठा महासंघ
आता तरी डोळे अन मन निट उघडे ठेऊन माहिती ग्रहण करा.
गुढी पाडवा या सणाचा छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्युशी संबंध जोडणे चुकीचे आहे. हा सण कृषी संस्कृतीशी संबंधित असून ‘गुढी’ हा शब्द बहुजनांच्या संस्कृतीमधील आहे. हिंदूंच्या धर्मग्रंथामध्ये व मराठी भाषेतील साहित्यामध्ये ‘गुढी’ हा शब्द इसवी सनाच्या १३व्या, १४व्या शतकापासून वापरला गेल्याचे आढळते. संत चोखोबांनी एके ठिकाणी म्हटलेले आहे,
टाळी वाजवावी | गुढी उभारावी |
वाट हे चालावी । पंढरीची ।।
संत चोखोबांच्या अभंगातील चरण
(श्री सकल संतगाथा, खंड १ला, श्री संतवाङ्मय प्रकाशन मंदिर, पुणे
प्रकाशक-रमेश शंकर आवटे, प्र.आ.१९२३, दु.आ.१९६७, पृ.१२९)
तसेच तुकारामांनी आपल्या अभंगातून किमान पाच वेळा गुढ्या उभारण्याचा उल्लेख केला आहे. कृष्णाच्या जन्मानंतर गोकुळामधी आनंद आनंद झाला आणि त्याभरात लोकांनी गुढ्या उभारल्या.
गोकुळीच्या सुखा | अंतपार नाही लेखा ॥
बाळकृष्ण नंदा घरीं | आनंदल्या नरनारी ॥
गुढिया तोरणे | करिती कथा गाती गाणे ॥ २८३९.१-४ ॥¬
संत तुकाराम महाराजांनीच आणखी एकदा म्हटलेले आहे,
रोमांच गुढियाडोलविती अंगें | भावबळें खेळविती सोंगें रे |
तुका म्हणे कंठ सद्गदित दाटे | या विठोबाच्या अंगसंगें रे ॥
अ.क्र.१९२.५ ॥
गुढी पाडवा सणाबाबत काही लोकांनी समाजात चुकीचे गैरसमज पसरविले असून गुढी पाडव्याचा संभाजी महाराजांच्या मृत्युशी जोडला जाणारा संबंध चुकीचा असून संत तुकाराम महाराजांचा मृत्यू इसवी सन १६५० मध्ये झाला. छत्रपती संभाजीराजांचा जन्म १६५७ मध्ये झाला. याचा अर्थ संभाजी महाराजांच्या जन्माच्या सुमारे ७ वर्षाआधी वैकुंठवासी झालेल्या संत तुकारामांचा हा अभंग इसवी सन १६५० पूर्वीच लिहिला गेला होता. म्हणून गुढी पाडव्याचा संभाजी महाराजांच्या मृत्युशी काहीही संबंध नाही.
उत्तर भारतात चांद्र मास पौर्णिमेला संपतात, म्हणजेच तिकडचे चांद्र मास पूर्णिमान्त असतात. दक्षिण भारतात चांद्र मास अमावस्येला संपून शुक्ल प्रतिपदेला नवीन महिना सुरू होतो. या पद्धतीनुसार महाराष्ट्रात चैत्र शुक्ल प्रतिपदा हा चैत्र महिन्याचा प्रारंभ ठरतो. चैत्र महिना हा बारा महिन्यांपैकी पहिला महिना होय. स्वाभाविकच, चैत्र शुक्ल प्रतिपदा हा वर्षाचा पहिला दिवस ठरतो. ‘प्रतिपदा’ या शब्दाचेच पाडवा असे रूपांतर झाले आहे. त्यामुळे चैत्र शुक्ल पाडवा हा नववर्षाचा पहिला दिवस होय.
म्हणून गुढी पाडवा हा सण नागरिकांनी मोठ्या प्रमाणावरती साजरा करावा व हिंदू संस्कृतीचे जतन करावे. गुढ्या उभारून घरावरती भगवा ध्वज लावावा व या सणाचे औचित्य साधून गारपिटग्रस्त शेतकर्यांीनासुद्धा मदत करावी, असे आवाहन मराठा महासंघाच्या वतीने करण्यात येत आहे.
श्री. राजेंद्र कोंढरे श्री. गुलाब गायकवाड
राष्ट्रीय सरचिटणीस जिल्हाध्यक्ष, पुणे
वसंत ॠतुचे आगमन, कृषिजीवनाशी निकटचा संबंध, निसर्गाबरोबरचे नाते, नवीन वर्षाचा प्रारंभ इ. कारणांनी चैत्र शुक्ल प्रतिपदेचे स्वागत करण्यासाठी आनंदोत्सव साजरा करावा, या भावनेने गुढी पाडवा साजरा करण्याची कृषी परंपरा आहे. गुढी पाडवा साजरा करणे वा न करणे, ही बाब ऐच्छिक आहे. गुढी पाडवा साजरा करू इच्छिणार्यांाना तसे करण्याचे स्वातंत्र्य आहे. तथापि, त्या दिवसाकडे इतर दिवसांपेक्षा वेगळा असा शुभ मुहूर्त म्हणून पाहण्याची आवश्यकता नाही. ज्यांना गुढी भगव्या पताकेच्या वा अन्य एखाद्या स्वरुपात उभी करण्याची इच्छा असेल, ते तसे करू शकतात.
गुढीविषयी काही तपशिल ः
1) गुढी हा शब्द अस्सल देशी आहे. त्याचे मूळ संस्कृत भाषेमध्ये नाही. याचाच अर्थ हा शब्द संस्कृत भाषेतून आलेला तत्सम वा तद्भव शब्द नाही. स्वाभाविकच, हा शब्द वैदिक परंपरेतील नसून बहुजनांच्या संस्कृतीमधील आहे. शब्द बहुजनांच्या संस्कृतीमधील असल्यामुळे त्याच्या मागची संकल्पनाही बहुजनांचीच आहे. कानडी भाषेमध्ये ‘ध्वज’ या अर्थाने ‘गुडी’ असा शब्द असून ‘राष्ट्रध्वज’ या अर्थाने ‘नाडगुडी’ असा शब्द आहे. ही गोष्ट देखील ‘गुढी’ हा शब्द संस्कृत भाषेतून आलेला नसून मूळचा बहुजनांच्या आणि प्रामुख्याने दक्षिण भारतीय बहुजनांच्या भाषेतील आहे, हे दर्शविणारा आहे.
2) मराठी भाषेमध्ये गुढी हा शब्द सुमारे इसवी सनाच्या तेराव्या-चौदाव्या शतकापासून वापरला गेल्याचे आढळते. उदा.-
संत चोखोबांनी एके ठिकाणी म्हटले आहे ः
टाळी वाजवावी | गुढी उभारावी |
वाट हे चालावी । पंढरीची ।।
संत चोखोबांच्या अभंगातील चरण
(श्री सकल संतगाथा, खंड १ला, श्री संतवाङ्मय प्रकाशन मंदिर, पुणे
प्रकाशक-रमेश शंकर आवटे, प्र.आ.१९२३, दु.आ.१९६७, पृ.१२९)
संत ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे ः
आइकैं संन्यासी तो चि योगी । ऐसी एकवाक्यतेची जगिं ।
गुढी उभिली अनेकीं । शास्त्रांतरी ।। ज्ञानेश्वरी ६.५२ ॥
‘स्मृतिस्थळ’ हा महानुभाव साहित्यामधील ग्रंथ सुमारे १४व्या शतकात लिहिला गेला आहे. या ग्रंथात ‘गुढी’ या शब्दाची ‘गुढ्या’ आणि ‘गुढेया’ ही रूपे पुढीलप्रमाणे आली आहेत ः
१ ः आणि तुम्ही गुढ्यासरीसें यावे ः (स्मृतिस्थळ ८३)
२ ः गुढेयासरिसें बैजोबा गाडेनिसिं निगाले ः (स्मृतिस्थळ ८५)
‘शिशुपाळवध’ हा महानुभाव साहित्यातील एक महत्त्वाचा ग्रंथ होय. त्यामध्ये म्हटले आहे ः
घेत स्पर्शसुखाची गोडी ः श्रीकृष्ण आळिंगिला भुजादंडीं
तंव आत्मा उभितसे गुढीः रोमांचमीसें ॥ शिशुपाळवध ६० ।।
(वरील उदाहरणांतील जाड ठसा मूळचा नव्हे.)
राम आणि सीता यांचा विवाह झाल्यानंतर ते अयोध्येकडे निघाले असताना परशुराम आडवा आल्यानंतर राम आणि परशुराम यांच्यामध्ये झालेल्या संघर्षात रामाने परशुरामाचा पाडाव केला. त्यानंतर दशरथांनी सर्व वर्हातडासह अयोध्येत प्रवेश केला. त्या वेळी अयोध्येतील प्रजेने ध्वज-पताका उभारल्याचे रामायणाने म्हटले आहे. ध्वज-पताका उभारल्या, म्हणजेच अयोध्येतील जनतेने आनंदाने गुढ्या उभारल्या, असा होतो.
संत तुकारामांनी आपल्या अभंगांतून किमान पाच वेळा गुढी / गुढ्या उभारण्याचा उल्लेख केला आहे.
कृष्णाच्या जन्मानंतर गोकुळामध्ये आनंदी आनंद झाला आणि त्या भरात लोकांनी गुढ्या उभारल्या, असे संत तुकारामांनी म्हटले आहे. त्यांचा यासंबंधीचा अभंग पुढीलप्रमाणे आहे ः
गोकुळीच्या सुखा । अंतपार नाही लेखा ।।
बाळकृष्ण नंदा घरी । आनंदल्या नरनारी ।।
गुढिया तोरणे । करिती कथा गाती गाणे ।। २८३९.१-४ ॥
कृष्णाने कालियावर मात केल्यानंतर त्याच्या गोपाळ मित्रांना अतिशय आनंद झाला. त्यांच्यापैकी जो चपळ होता, त्याच्या हातात गुढी देऊन त्याला कृष्णाने आनंदाची बातमी देण्यासाठी पुढे पाठविले, हे नोंदविताना तुकारामांनी म्हटले आहे,
पुढ पाठविले गोविंदें गोपाळा । देउनि चपळा हातीं गुढी |।४५५३.२।।
आनंदाची ही बातमी गोकुळात पोचल्यानंतर तेथे काय घडले, ते सांगताना तुकाराम म्हणतात,
शुभ मात तिहीं आणिली गोपाळीं । चेंडू वनमाळी घेउनि आले ॥
आली दारा देखे हरुषाची गुढी । सांगितली गुढी हरुषें मात ॥
४५५५.१,२ ।।
त्यानंतर कृष्ण गोकुळात आल्यावर तेथे किती आनंदाचे वातावरण होते, ते नोंदविताना तुकाराम म्हणतात,
नेणे वर्णधमर्जी आली समोरी | अवघी च हरी आळिंगिली ॥
हरि लोकपाळ आले नगरात | सकळांसहित मायबाप ॥
पारणे तयांचे जाले एका वेळे | देखिले सावळे परब्रह्म ॥
ब्रह्मानंदें लोक सकळ नाचती | गुढिया उभविती घरोघरीं ॥
घरोघरीं सुख आनंद सोहळा | सडे रंग माळा चौकदारी ॥
४५५६.१-५ ॥
संत तुकारामांनीच आणखी एकदा म्हटले आहे,
रोमांचगुढिया डोलविती अंगें | भावबळें खेळविती सोंगें रे |
तुका म्हणे कंठ सद्गदित दाटे | या विठोबाच्या अंगसेंगें रे ॥
अ.क्र.१९२.५ ॥
(जाड ठसा मूळचा नव्हे.)
संत तुकारामांचा मृत्यू इसवी सन १६५० मध्ये झाला. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म इसवी सन १६५७ मध्ये झाला. याचा अर्थ संभाजी महाराजांच्या जन्माच्या सुमारे ७ वर्षे आधी वैकुंठवासी झालेल्या संत तुकारामांचा हा अभंग इसवी सन १६५० पूर्वीच लिहिला गेला होता.
उत्तर भारतात चांद्र मास पौर्णिमेला संपतात, म्हणजेच तिकडचे चांद्र मास पूर्णिमान्त असतात. दक्षिण भारतात चांद्र मास अमावस्येला संपून शुक्ल प्रतिपदेला नवीन महिना सुरू होतो. या पद्धतीनुसार महाराष्ट्रात चैत्र शुक्ल प्रतिपदा हा चैत्र महिन्याचा प्रारंभ ठरतो. चैत्र महिना हा बारा महिन्यांपैकी पहिला महिना होय. स्वाभाविकच, चैत्र शुक्ल प्रतिपदा हा वर्षाचा पहिला दिवस ठरतो. ‘प्रतिपदा’ या शब्दाचेच पाडवा असे रूपांतर झाले आहे. त्यामुळे चैत्र शुक्ल पाडवा हा नववर्षाचा पहिला दिवस होय.
महाराष्ट्रातील निसर्गचक्राचा विचार करता चैत्र आणि वैशाख हे दोन महिने वसंत ॠतूचे मानले जातात. शिशिर ॠतूमध्ये पानगळ झालेल्या वृक्षांना चैत्रामध्ये वसंत ॠतूचे आगमन झाल्यानंतर नवीन पालवी फुटू लागते. या पालवीला ग्रामीण भागात ‘चैत्र-पालवी’ असे म्हटले जाते. याचा अर्थ चैत्र शुक्ल प्रतिपदा हा दिवस वसंत ॠतूच्या आगमनाचा द्योतक आहे. तो चै. पालवीच्या आगमनाचा दिवस असल्यामुळे कृषिसंस्कृतीशी निगडित आहे.
इसवी सन ७८ पासून ‘शके’ या कालगणनेचा जो प्रारंभ करण्यात आला आहे, त्या कालगणनेनुसार नव्या वर्षाची सुरवात चैत्र शुक्ल प्रतिपदेला होतो.
सौर पद्धतीच्या कालगणनेनुसार वर्षाची नोंद करण्याच्या बाबतीत भारत सरकारने ‘शके’ या कालगणनेचाच स्वीकार केला आहे. या कालगणनेनुसार चैत्र शुक्ल प्रतिपदा हा वर्षाचा पहिला दिवस येतो.
गुढी पाडवा हा सण महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटक, आंध्र, गोवा आणि गुजरात या राज्यांतूनही कोणत्या ना कोणत्या स्वरुपात साजरा केला जातो.
या दिवशी महाराष्ट्रात गुढीची पूजा केली जाते. तिच्या गळ्यात हार घातला जातो. हे पाहता या दिवशी गुढीचा अनादर केला जात नाही, तर तिच्याविषयी आत्यंतिक आदर व्यक्त केला जातो.
गुढीसाठी स्त्रियांची वस्त्रे वापरणे, हा स्त्रियांचा अनादर असण्यापेक्षा मातृसत्ताक अथवा स्त्रीसत्ताक समाजपद्धतीमध्ये स्त्रियांना जे प्राधान्य दिले जात होते त्याचे द्योतक असल्याची शक्यता आहे.
गुढीच्या टोकावर पालथे ठेवले जाणारे भांडे हे राणीच्या मस्तकावर ठेवल्या जाणार्या मुकुटाचे प्रतीक असू शकते.
चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी कडू लिंबाच्या पानांचा उपयोग कोणत्या ना कोणत्या प्रकारे करण्याची पद्धत महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, आंध्र, गोवा आणि गुजरात या राज्यांमध्ये आढळते. या पानांचा थोडा का होईना रस चाखण्याची वा पिण्याची प्रथा या राज्यांमध्ये आहे. या दिवशी कच्च्या कैरीचे पन्हेही बनविले जाते. याचा अर्थ कडू आणि आंबट रस अनुभवले जातात. शिवाय गोड, तिखट, खारट आणि तुरट चवीचे पदार्थ भोजनात असतातच. याचा अर्थ, या दिवशी, निसर्गाने निर्माण केलेल्या सर्व चावींचा आस्वाद घेतला जातो. मानवी जीवनातील सुख-दुःख वगैरे प्रकारच्या विविध अनुभवांना संतुलित वृत्तीने सामोरे जावे, असे वर्षाच्या पहिल्या दिवशी सुचविण्याचे कार्य विविध रसांच्या अनुभवांमुळे घडते, असे मानता येते.

छत्रपती संभाजी राजेंच्या चरणी

छ : छंद तुझा करी मृत्युला बेधुंद
त्र : त्रस्त झाला मृत्यु पाहुन डोळे लालबुदं
प : पचवीले विष तु धर्मासाठी
ती : तीर्थस्वरुप दैवत मराठ्याचें
रा : राखीला धर्म तु आमच्यासाठी
जे : जेव्हां कोपला सैतान तुटला स्वराज्यावर
सं : संभाळली दौलत मराठी तळहातावर
भा : भागवीली तहान शत्रुच्या रक्तावर
जी : जीवाशि खेळनाऱ्या शिवबाचा तु पुत्र
म : मशाल तुच क्रांतीची बलीदानाचे सुत्र
हा : हार न मननारा
रा : राजाच राजेपन जाणनारा
जा : जातीचा वाघ तु मर्द मराठा
ना : नाही जन्मला असा तुच एकटा
मा : माघार नाही मंजुर तुला
ना : नाही सैतानापुढे तु झुकला
चा : चारही दिशा तुझाच धाक...
मु : मुगलाचां तु एकमेव बाप
ज :जय जय जयकार तुझा
रा : राजा एकटा शंभु माझा..

छत्रपती संभाजी महाराज
यांच्या 'बलीदानदिना'
च्या निमित्ताने...
1. जगातील पहिले बुलेट पृफ जॉकेट युद्ध भूमीवरील गरज लक्षात घेऊन
फक्त एका महिन्यात तयार करणारा
2. जगातील पहिला तरंगता तोफखाना तयार करणारा
3. जंजिरा जिंकण्यासाठी उसळत्या सागरात ८००
मीटर सेतू बांधणारा
4. आदिलशाही ,कुतुबशाही एकजूट करणारा आणि त्याच
वेळी सिद्धी ,पोर्तुगीज व इंग्रजाना त्यांच्या बिळातकोंडून ठेवणारा त्याच
वेळी मोघलानचा गर्दनकाळ ठरलेला
5. दुष्काळ ग्रस्त गावांना कायमस्वरूपी पाणी मिळावे म्हणून डोंगर पोखरून
जल नियोजन करणारा .
6. उत्तर प्रदेशपासून दूर तामिळनाडूकर्नाट क आणि राजस्थान प्रांतातील
लोकांनाही स्वराज्यासाठी एकत्र करणारा
7. इतर धर्मांचा मान सन्मान करणारा आणि धर्मातरावर कायदेशीर
बंदी घालणारा
8. बालमजुरी व बेट बिगरि विरुद्ध कायदा करणारा
9. शिवप्रभुंची इच्छा पूर्णकरण्यासाठी राज्याभिषेक झाल्यावर पंधरा दिवसात
दूर मध्य प्रदेशातील बुर्हाणपूरवर छापा घालणारा
10. स्वराज्याला आर्थिक संपन्न ठेवणारा
11. देहू ते पंढरपूर आषाढीला संरक्षण व अर्थ पुरवठा करणारा
12. दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांना शेतीसाठी पिक कर्ज योजना राबविणारा
13. सैनिकांच्या उत्पनाला इतर मार्गाने हातभार लागावा म्हणून
चरईची सवलत कायम ठेवणारा
14. आपले आरमार सुसज्ज करण्यासाठी परदेशातून तंत्रज्ञान व प्रशिक्षित
लोकांचे सहकार्य घेणारा
15. स्वत:चे आधुनिक बारुदखाने तयार करून स्वदेशीचा महामंत्र देणारा
आपला शंभू राजा........... ....
काळोखातूनी विजयाचा हे पहाटचा तारा
प्रणाम माझा पहिला तुजला मृत्यूंजय वीरा...
!*जय छत्रपती शिवराय...!
।जय छत्रपती संभाजी राजेंच्या चरणी
मानाचा त्रिवार मुजरा !*****



कसा होता आमचा शंभुराजा

कसा होता आमचा शंभुराजा..!!
* १४ मे १६५७ रोजी पुरंदरावर जन्माला आलेला युगंधर म्हणजे शंभुराजा.
* वयाच्या दुसर्या वर्षी आईविना पोरका झालेला बाळ म्हणजे शंभुराजा.
* वयाच्या नवव्या वर्षी ४ हजारांची मनसबदारी स्वीकारणारा म्हणजे शंभुराजा.
* वयाच्या दहाव्या वर्षी आग्र्याच्या भेटीला जाणारा शिवपुञ म्हणजे शंभुराजा.
* वयाच्या अकराव्या वर्षी ५ हजारांची मनसबदारी स्वीकारणारा म्हणजे शंभुराजा.
* वयाच्या तेराव्या वर्षी रायप्पा महाराचा भर दरबारात सत्कार करणारा म्हणजे शंभुराजा.
*वयाच्या चौदाव्या वर्षी महान बुधभुषण नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिणारा संस्कृतपंडीत म्हणजे शंभुराजा.
* वयाच्या पंधराव्या वर्षी वेगवेगळ्या भाषेतील तीन महान ग्रंथ लिहिणारा म्हणजे शंभुराजा.
* वयाच्या सोळाव्या वर्षी १० हजार सैनिकांचे नेतृत्व करणारा कुशल सेनानी म्हणजे शंभुराजा.
*वयाच्या सतराव्या वर्षी फोंडा किल्ला घेण्यासाठी शिवरायांना सहकार्य करणारा म्हणजे शंभुराजा.
* वयाच्या अठराव्या वर्षी शिवरायांच्या गादीचा पहिला युवराज म्हणजे शंभुराजा.
* वयाच्या एकोणिसाव्या वर्षी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची जगातील पहिली पालखी देहू ते पंढरपूर ही पहिली वारी सुरू करणारा म्हणजे शंभुराजा.
*वयाच्या तेविसाव्या वर्षी शिवरायांच्या गादीवर बसणारा दुसरा छञपती म्हणजे शंभुराजा.
* वयाच्या तेविसाव्या वर्षापासुन बत्तीसाव्या वर्षापर्यंत इंग्रज, पोर्तूगीज, फ्रेँच, डग आणि मोगल या पाच सत्ताधार्यांशी लढणारा म्हणजे शंभुराजा.
आणि
* वयाच्या बत्तीसाव्या वर्षी छञपती शिवरायांच्या स्वराज्यासाठी,आणि स्वाभिमानासाठी आपल्या देहाचे बलिदान करणारा शुरवीर योद्धा म्हणजे आमचा शंभुराजा****छत्रपती संभाजी राजेंच्या चरणी मानाचा त्रिवार मुजरा !

शिवशाही

क्षत्रियाचे रुधिर ठिबके शिवलिंगावरी
नरव्याघ्र निर्मिले हाती पाजळल्या समशेरी
खंडो खोपड्यासम कैक तोडले षंढ
सह्याद्रीवर निर्मिली भगवी सत्ता अखंड
दिसतात अजुनही डाग रक्ताचे त्या दगडावरी
अफजल फाडून मायभूस अभिषेकले कृष्णेतीरी
हा मावळा घालतो मुजरा राजं तुम्हास तीन हाती
एका सुर्याने पेटवल्या करोडो स्वातंत्र्य ज्योती
राजदंड हाती घेतला अवतरली शिवशाही भुवरी
झुकल्या-वाकल्या गर्विष्ठ माना या शिवमंदिरी
मुजरा.......राजं..........मुजरा

!! छत्रपति संभाजीराजे भोसले !!

संभाजीराजे भोसले (१४ मे, इ.स. १६५७; पुरंदर किल्ला, पुणे जिल्हा, महाराष्ट्र - ११ मार्च, इ.स. १६८९; तुळापूर, महाराष्ट्र) हे छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते....1)लहानपण.....संभाजीराजांचा जन्म १४ मे, इ.स. १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे पुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. संभाजीराजांच्या आईचे, सईबाईंचे निधन राजे अगदी लहान असताना झाले. त्यानंतर पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ नावाची स्त्री त्यांची दूध आई बनली. संभाजीचा सांभाळ त्यांची आजी जिजाबाई यांनी केला. सुरुवातीच्या काळात त्यांच्या सावत्र आई, सोयराबाई यांनीदेखील त्यांच्यावर खूप माया केली.
अनेक ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते. राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले. मोंगल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले. त्यावेळी संभाजीराजे ९ वर्षाचे होते. शिवाजी महाराज आग्‍ऱ्याच्या कैदेतून निसटल्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ संभाजी राजांना सोसली नसती आणि त्यामुळे त्यांना काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे होते. त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना मोरोपंत पेशव्यांच्या मेहुण्याच्या घरी मथुरेला ठेवले. मोंगली सैनिकांचा संभाजीराजांच्या मागचा ससेमिरा थांबवण्याच्या उद्देशाने शिवाजी महाराजांनी संभाजीराजांचे निधन झाल्याची अफवा पसरवून दिली. ते स्वराज्यात पोहोचल्यानंतर काही काळाने संभाजीराजे सुखरूपपणे स्वराज्यात येऊन पोहोचले..2).तारुण्य आणि राजकारन .इ.स. १६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तोपर्यंत संभाजीराजे राजकारणातील बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले होते. त्यांच्या विनम्र स्वभावाने राज्याभिषेकासाठी रायगडावर आलेल्या प्रतिनिधींना जिंकून घेतले.
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर १२ दिवसात जिजाबाईंचे निधन झाले. त्यानंतर संभाजीराजांकडे मायेने लक्ष देणारे कोणी राहिले नाही. शिवाजी महाराज स्वराज्याच्या राजकारणात आणि रणांगणावर गुंतले होते.
सळसळत्या रक्ताच्या तरुण संभाजीराजांचे शिवाजी महाराजांच्या दरबारातील अनुभवी मानकऱ्यांशी अनेकदा मतभेद होऊ लागले. संभाजीराजांचा महाराजांचे अमात्य अण्णाजी दत्तोंच्या कारभाराला सक्त विरोध होता. शिवाजी महाराजांनी अण्णाजी हे अनुभवी आणि कुशल प्रशासक असल्यामुळे त्यांच्या भ्रष्ट कारभाराकडे अनेकदा दुर्लक्ष केले. पण संभाजीराजांना ते मान्य होणे कठीण होते. एकदा भर दरबारात अण्णाजी येताच संभाजीराजांनी, 'आबासाहेब, हे बघा आपले लबाड अमात्य आले' असे उद्गार काढल्याचे इतिहासात नमूद केले आहे. या कारणांमुळे अण्णाजी दत्तो आणि इतर अनुभवी मानकरी संभाजीराजांच्या विरोधात गेले.
सोयराबाई आणि दरबारातील काही मानकरी संभाजीराजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागले. त्यांच्या विरोधामुळे त्यांना शिवाजी महाराजांबरोबर दक्षिण हिंदुस्थानच्या मोहिमेवर जाता आले नाही. तसेच शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत संभाजीराजांचे हुकूम पाळण्यास अष्टप्रधानमंडळाने नकार दिला. त्यामुळे शिवाजी महाराजांना कोकणातील शृंगारपूरचे सुभेदार म्हणून संभाजीराजांना पाठवावे लागले. अफझलखान, शाहिस्तेखान यांच्यासारख्या बलाढ्य शत्रूंना खडे चारणारे युगपुरुष शिवाजी महाराज घरातील बेबनावापुढे दुर्दैवाने हतबल ठरले. आपल्याला दक्षिण हिंदुस्थानच्या मोहिमेपासून जाणीवपूर्वक दूर ठेवले गेल्याचा सल संभाजीराजांच्या मनात कायम राहिला.
शृंगारपूरचे सुभेदार म्हणून संभाजीराजांनी दुष्काळग्रस्त प्रजेकडून एक वर्ष करवसुली न करायचा निर्णय घेतला. तेव्हा सोयराबाई आणि दरबारातील मानकऱ्यांनी संभाजीराजे हे बेजबाबदार प्रशासक आहेत आणि राज्याचे वारस म्हणून योग्य नाहीत असा प्रचार सुरू केला. सोयराबाईंची अपेक्षा होती की शिवाजी महाराज राज्याचे वारस म्हणून राजारामांचे नाव जाहीर करतील....3).साहित्यिक संभाजीराजे..अफाट मोगली सैन्याशी धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणारा हा छत्रपती उत्तम साहित्यिक आणि संस्कृत चा उत्तम जाणकारही होता. संभाजी महाराजांनी बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ, तर नायिकाभेद, नखशीख आणि सातसतक हे ब्रज भाषेतले ग्रंथ लिहिले. बुधभूषण या ग्रंथात अतिशय सुंदर आणि अलंकारिक भाषेत आपले वडील शिवाजीराजे यांचा उल्लेख आहे:
कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं य: ।
जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:) स शिवछत्रपतिजयत्यजेय: ॥
अर्थ-"कलिकालरूपी भुजंग घालितो विळखा,करितो धर्माचा ऱ्हास
तारण्या वसुधा अवतरला जगत्पाल, त्या शिवप्रभूंची विजयदुंदुभी गर्जू दे खास ॥ 4).."मोगल सरदार...या सगळ्या घडामोडींमुळे संभाजीराजे अत्यंत व्यथित झाले आणि त्यांनी शिवाजी महाराजांचे स्वराज्य सोडून औरंगजेबाचा सरदार दिलेरखानाला सामील व्हायचा निर्णय घेतला. त्यांना पुढे करून दिलेरखानाने स्वराज्यातील भूपाळगड या किल्ल्यावर हल्ला केला. किल्लेदार फिरंगोजी नरसाळाने किल्ला नेटाने लढवला पण शत्रुपक्षात युवराज संभाजीराजे आहेत हे कळताच शरणागती पत्करली. संभाजीराजांनी गडावरील सैनिकांना सुरक्षितपणे जाऊ द्यायची मागणी दिलेरखानाकडे केली. पण विजयोन्मादाने हर्षभरित झालेल्या दिलेरखानाने ७०० मराठी सैनिकांचा प्रत्येकी एक हात तोडायचा आदेश दिला. संभाजीराजांना त्याचा भयंकर संताप आला. त्यानंतर दिलेरखानाच्या सैन्याने अथणीवर हल्ला करून तेथील जनतेवर अनन्वित अत्याचार केले. संभाजीराजांनी दिलेरखानाकडे या अत्याचारांचा जाब विचारला. पण दिलेरखानाने त्यांना जुमानले नाही. संभाजीराजांना त्यांची चूक कळली आणि ते विजापूरमार्गे स्वराज्यातील पन्हाळगडावर येऊन दाखल झाले. ते स्वराज्यापासून सुमारे एक वर्ष दूर होते.
संभाजीराजांचे स्वराज्य सोडून जाणे शिवाजी महाराजांना जिव्हारी लागले. त्यांनी त्यांची पन्हाळगडावर भेट घेतली. त्यांनी संभाजीराजांना शिक्षा केली नाही. संभाजीराजांची त्यांनी स्वतः समजूत काढली. मात्र संभाजीराजांच्या स्वराज्य सोडून जाण्यामुळे त्यांच्यात आणि सोयराबाई, अण्णाजी दत्तो आणि इतर मानकऱ्यांमधील दरी अजूनच रुंदावली. सोयराबाईंनी संभाजीराजांना राजारामाच्या विवाहासाठी रायगडावर बोलावले नाही. शिवाजी महाराजांचे राजारामाच्या विवाहानंतर काही दिवसात निधन झाले. ही बातमी सोयराबाईंनी संभाजीराजांना पन्हाळगडावर कळवलीच नाही.
सोयराबाई आणि अण्णाजी दत्तो यांनी संभाजीराजांना पन्हाळगडावर कैद करायचा हुकूम पन्हाळ्याचा किल्लेदारास सोडला. त्यांना कैद करून राजारामांचा राज्याभिषेक करायचा त्यांचा डाव होता. या अवघड प्रसंगी सरनोबत हंबीरराव मोहिते यांनी संभाजीराजांची बाजू घेतली. वास्तविक हंबीरराव मोहिते हे सोयराबाईंचे सख्खे बंधू होते. पण संभाजीराजे हे गादीचे हक्काचे वारसदार होते. तसेच शिवाजी महाराजांच्या अखेरच्या दिवसात लवकरच औरंगजेब सर्व सामर्थ्यानिशी स्वराज्यावर हल्ला करणार अश्या बातम्या येत होत्या. अशा प्रसंगी संभाजीराजांसारखा खंबीर राजा गादीवर असणे गरजेचे होते. राजारामासारखा अननुभवी राजा अशावेळी असणे दौलतीसाठी हानिकारक ठरेल याची हंबीररावांना जाणीव होती. हंबीररावांनी सैन्याच्या मदतीने कट उधळून लावला आणि अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पेशव्यांना कैद केले. मोरोपंत पेशव्यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध सोयराबाई आणि अण्णाजी दत्तो यांनी कटात सहभागी केले होते......
शिवछत्रपति संभाजीराजे याना मानाचा मुजरा ......

शंभुराजे कृत नखशिख मधील श्लोक

शंभुराजे कृत नखशिख मधील श्लोक
श्री गणजूलिखिते संभूकृत नखशिख
पद पद पत्र सम चरण जंघ जिमी कनक कर मकर ॥
नाभी ललित गभीर, उदर लंबित विसाल वर॥
उर दीरघ अति मंजु चारि कर, देत चारि फल॥
एक दंत अरू सुंड लषत, हरि जात सकल मल॥
अति नैन चारू ढाली फलक श्रवन सीस छविसों मढत ॥
ग्यान होत अग्यान के सो गननायक गुन पढत ॥
अर्थ: गणेशाचे पाय हे कमलपात्राप्रमाणे समचरण ,
जांघ सोनेरी माशांची बनविलेली असून,
नाभी खोल तर पोट लांब आहे.गणेशाची छाती अत्यंत विशाल असून चार हात धर्म, अर्थ, काम व मोक्ष आहेत.
एक दात आणि सोंड ही सगळ्या पापाचे हरण करीत आहेत.
अत्यंत सुंदर डोळे,मोकळे कान व शिर्ष सौंदर्याने नटवलेले आहे.
गणेशाचे गुणगान केल्यामुळे अज्ञानी मनुष्यही ज्ञानी होतो.

!! जय शिवराय !!

पैज प्रतिपाल भर भुमीको हमाल,
चहु चक्कको अमाल भयो दंडक जहानको !!
साहीन की साल भयो, ज्वार को जवाल भयो,
हर को कृपाल भयो, हर के विधानको !!
वीर रस ख्याल सिवराज भू-अपाल तेरो,
हाथके बिसाल भयो भूषण बखानको !!
तेज तरवार भयो, दख्खनकी ढाल भयो,
हिंदुकी दिवार भयो, काल तुरकानको !!
काल तुरकानको !! काल तुरकानको !!
काल तुरकानको !! काल तुरकानको !!
- कविराज भूषण
अर्थ :
शिवराज भूपाल - प्रतिज्ञा पूर्णत्वास पोचवणारा, भूमीभार शिरावर घेणारा, चहूं दिशांच्या राज्यांवर अम्मल गाजवणारा, जगतास शासन करणारा, तसेच बादशहास शल्ल्याप्रमाणे जाचणारा, (प्रजेची) पीडा हरण करणारा आणि नरमुण्डमाला अर्पण करण्याच्या विधीने महादेवावरही कृपा करणारा असा झाला. भूषण म्हणतो तूझी तरवार दख्खनला ढालीप्रमाणे व हिंदूंना भिंतीप्रमाणे रक्षण करणारी झाली असून तुर्कांन्ना (ईस्लामला) मात्र प्रत्यक्ष काळ झाली आहे. वीररस प्रिय अशा शिवरायाच्या विशाल भुजांचे (ज्या स्वत: शक्ती संपन्न असून इतरांनाही शक्ती देणार्‍या आहेत) कोण वर्णन करू शकेल?

शिवछत्रपतींचे अष्टप्रधान मंडळ

* शिवछत्रपतींचे अष्टप्रधान मंडळ *
शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटीत प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर शिवरायांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक स्वराज्य उभे केले. आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले. शिवरायांनी निर्माण केलेल्या आदर्श संहिते मधील आणखी एक पैलू म्हणजे अष्टप्रधान मंडळ !
' अष्टप्रधान ' हा शब्द आपण बऱ्याच वेळा ऐकला असेल. परंतु हे अष्टप्रधान कोण होते, त्यांचे अधिकार काय होते याची माहिती पुढीलप्रमाणे-
१) मुख्यप्रधान अर्थात पेशवे :-
राजानंतर अधिकाराने सर्वात महत्वाची व्यक्ती म्हणजे पेशवे. राजाच्या गैरहजेरीत सर्व कारभार प्रधान सांभाळीत असत.राज्याची एकंदर व्यवस्था सुरळीत आहे कि नाही हे पाहणे तसेच वेळ आल्यास युद्धात नेतृत्व करणे, सैन्य घेऊन नवीन प्रदेश जिंकणे अशी विविध कामे प्रधानांकडे असत.खलीत्यांवर, पत्रांवर राजाच्या शिक्क्यानंतर पेशव्यांचे शिक्कामोर्तब होई. मोरोपंत पिंगळे हे पहिले पेशवे होते.
२) अमात्य :- आजच्या भाषेत अमात्य म्हणजे अर्थमंत्री किंवा finance minister. राज्यातील एकंदर जमाखर्चांवर अमात्यांचे नियंत्रण असे. रामचंद्र नीलकंठ मुजुमदार हे अमात्य होते.
३) सेनापती उर्फ सरनौबत :- संपूर्ण लष्करावर सेनापतीचे नियंत्रण असे. लष्कराचा कारभार, सैनिकांचे वेतन, युद्धात जे पराक्रम गाजवतील त्यांचा छत्रपतींच्या हस्ते सत्कार, युद्ध प्रसंगी नेतृत्व इ. कामे सेनापतींच्या अधिकारात असत. लष्कराचे घोडदळ आणि पायदळ असे दोन मुख्य प्रकार होते. हंबीरराव मोहिते हे सेनापती होते. यांचे मूळ नाव 'हंसाजी मोहिते'. ' हंबीरराव' हि महाराजांनी त्यांस दिलेली पदवी आहे.
४) सचिव :- सचिव म्हणजे सेक्रेटरी. सरकारी दफ्तरावर सचिवाची देखरेख असे.सर्व पत्रव्यवहार सचिवाच्या खात्याकडून होत असे. अण्णाजी दत्तो हे सचिव होते.
५) मंत्री :- राजाचे आमंत्रित पाहुणे तसेच भेटीस येणारे लोक यांचे स्वागत करणे, बारा महाल, अठरा कारखाने यांचा बंदोबस्त ठेवणे, राजांच्या दिनचर्येची नोंद ठेवणे इ. मंत्र्याची कामे असत.राजाची राजकीय बाजू सांभाळणे तसेच खासगी सल्लागार म्हणून मंत्र्याची नियुक्ती असे.दत्ताजी त्रिंबक वाकनीस हे मंत्री होते.
६) सुमंत किंवा डबीर :- सुमंत म्हणजेच सोप्या भाषेत परराष्ट्र व्यवहार मंत्री किंवा external affairs minister.परराष्ट्र संबंधित सर्व व्यवहार सुमंत पाहत असत. परराष्ट्र राजकारण पाहणे,अन्य राज्यांमधून येणाऱ्या वकिलांची बडदास्त ठेवणे,परराष्ट्राशी होणारा पत्रव्यवहार सांभाळणे ही मुख्यतः सुमान्ताची कामे होत.रामचंद्र त्रिंबक हे सुमंत होते.
७) न्यायाधीश :- न्यायाधीश या शब्दातूनच याचे अधिकार स्पष्ट होतात. निराजी रावजी हे न्यायाधीश होते.
८) पंडितराव :- धार्मिक बाजू सांभाळण्याचे काम पंडितराव किंवा न्यायशास्त्री कडे असे.मोरेश्वर हे न्यायशास्त्री होते.
शिवरायांच्या याच अष्टप्रधान मंडळाच्या धर्तीवर भारतीय राजकारणातील मंत्रीमंडळाची रचना केली आहे. 350 वर्षापूर्वी महाराजांनी केलेली कृती आजही व भविष्यकाळातही मार्गदर्शक म्हणून ठरणार आहेत.

घोसाळगड उर्फ वीरगड

महाराष्ट्रातील अपरिचीत किल्ल्यांपैकी एक असलेल्या घोसाळगडाविषयी :-
"रायगडमधील घोसाळगड"
घोसाळगड उर्फ वीरगड
हा किल्ला रायगड जिल्ह्यात आहे.
दुर्गसंपन्न असलेल्या कोकणातील रायगड
जिल्ह्यात रोहे तालुक्यात
घोसाळगडचा किल्ला आहे. मुंबई-पुणे या महानगराशी रोहे गाडीमार्गाने जोडले गेले आहे. शिवकालापासून प्रसिध्द असलेले रोहे गाव
कुंडलिका नदीच्या दक्षिण तीरावर वसलेले आहे. मुंबई-पणजी महामार्गाच्या पश्चिमेकडे असलेल्या रोहे येथे जाण्यासाठी महामार्गावरील
नागोठाणे तसेच कोलाड येथून फाटे आहेत.
रोहे येथून मुरूड या सागरकिनार्यावरी
ल गावाला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. त्यापैकी एक चणेरे, बिरवाडीकडून कुंडलिका नदीच्या किनार्याने जातो. तसेच दुसरा मार्ग घोसाळगडकडून भालगाव मार्ग जातो. याच मार्गावर घोसाळगडचा किल्ला आहे.
चारहि बाजूंनी लहान-
मोठ्या डोंगरांच्यामधे घोसाळगड विराजमान झालेला आहे.
समुद्रसपाटीपासून २६० मीटर उंच असलेल्या घोसाळगडचा आकार दुरून शिवलिंगासारखा भासतो. रोहे एस. टी. स्थानकावरून
घोसाळगडला जाण्यासाठी एस. टी. बसेसची सोय आहे. गडाच्या पायथ्याजवळ गाव आहे.
गावातूनच गडावर जाण्याचा मार्ग आहे.
रस्ता संपल्यावर पायर्याँचा मार्ग केलेला आहे. या पायर्याँच्या मार्गावर
भवानी मातेचे मंदिर आहे. पुढे गणपतीचे प्रशस्त मंदिर आहे. येथून पंधरा मिनिटांत तटबंदीजवळ पोहोचता येते. कातळात
कोरलेल्या पायर्या दिसतात. येथून
दरवाजापर्यँत जाता येते. प्रवेशद्वार नष्ट झाले आहे. याचे काही अवशेष येथे आहेत. या अवशेषांमध्ये
वाघांची चित्रेही कोरलेली आहेत. गडाच्या माथ्यावरून तळागडाचे दर्शन होते. कुडे मांदाडच्या खाडीचे द्रश्य
आपल्याला खिळवून ठेवते. शिवकालामध्ये
स्वराज्यात असलेला घोसाळगड पूर्वी निजामशाहीमध्ये होता. गडदर्शन करून आल्या वाटेने उतरून परतीचा मार्ग पकडता येईल.
माहिती साभार : दै.पुढारी (सांगली)
दि. २५ डिसेँबर २०१३
गडवाट

कान्होजी आंग्रे

कान्होजी आंग्रे यांचा जन्म १६६९ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या हर्णे या गावी एका संकपाळ कुटुंबात (सध्याचे भिलारे) झाला. त्यांचे मूळ आडनाव कडू होते. संकपाळ हे “वीर राणा संक” या संप्रदायाचे होते. त्यांच्या वडिलांचे नाव तुकोजी आणि आईचे अंबाबाई होते. असे म्हणतात की, बराच काळ मूलबाळ न झाल्याने ’तुझ्या अंगार्‍याच्या आशीर्वादाने जर आम्हाला मूल झाले तर आम्ही त्याला तुझे नाव देऊ आणि आमचे आडनाव अंगारे (जे पुढे आंग्रे झाले) असे ठेऊ त्याप्रमाणे झाल्यामुळे ते कान्होजी आंग्रे म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांचे बरेच बालपण सुवर्णदुर्ग या सागरी किल्ल्याच्या परिसरात गेले. हा किल्लाच पुढे त्यांनी काबीज केला. त्यांचे वडीलही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदरी सरदार होते. कान्होजींना लहानपणापासूनच समु सफरींची आणि साहसी मोहिमांची आवड होती.
१६९८ मध्ये साताराच्या भोसल्यांनी त्यांना दर्यासारंग अशी पदवी देऊन,मुंबई पासून विंगोरिया (आताचे वेंगुर्ला) पर्यंतच्या किनारपट्टीची जबाबदारी सोपवली. सिद्दी जोहर च्या ताब्यातले जंजिरा मात्र मुघलांच्या अधिपत्याखाली राहिले. कान्होजींनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनींच्या व्यापारी जहाजांवर हल्ला चढवून केली. अनेक प्रयत्नांनंतरही कान्होजींच्या आरमाराचा पराभव करण्यात अपयश आल्याने ब्रिटिशांनी कोकण किनारपट्टीवर त्यांचे वर्चस्व मान्य करत शांततेचा तह केला.
१७०७ मध्ये कोल्हापूरचे छत्रपती शाहू गादीवर येताच, त्याच्या आदेशान्वये त्यांचे सेनापती पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांनी कान्होजींबरोबर करार केला. या करारान्वये त्यांची मराठा आरमार प्रमुख म्हणून नेमणूक झाली. मराठेशाहीच्या गादीवर दावा करणार्‍या ताराबाईंशी कान्होजीचे सख्य होते. ते मोडून त्यांना आपल्याबाजूला खेचण्यासाठी शाहू महाराजांनी ही राजकीय खेळी केली होती असे म्हटले जाते.
कान्होजींनी औरंगजेबाच्या दख्खन मोहिमेविरुद्ध लढण्यासाठी मराठ्यांना मोलाची मदत केली. सरखेल कान्होजी आंग्रेंच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन आणी मानाचा मुजरा 


संभाजी राजा

औरंगजेब थयथया नाचवलाय ...
पोर्तुगीज वाकवलाय ...
इंग्रज झुकवलाय ...
सिद्दी पार अडवा केलाय ...
एक नाही दोन नाही पाब्बर १२ घोडांवर निकराचे पंजेफाड करत सेना धुरंदर सर्जा संभाजी अजिंक्यच राहिलाय.
गोव्यावर हल्ला केला. पार मांडवी नदी तुडवून संभाजी राजे गोव्यात घुसणार. तो व्हाईसराय पार पार वैतागला. गोवा हि राजधानी सोडून त्याने दुसरीकडे राजधानी बनवण्याचा डावही मांडला.
इंग्रजांशी तह केला.
इंग्रजांची मस्ती पुरती जिरवली. सरळ केजरी नावाच्या गवर्नरला सांगितल,
“मुंबई विकत दे आणि चल चालू पड”.
अरे जर संभाजी राजांनी त्यावेळी तहात मुंबई विकत घेतली असती ना, तर १५० वर्ष इंग्रजांचे पाय आमच्या छाताडावर नाचालेच नसते. इंग्रजांचा धोका ओळखला होता ना तो या सर्जा सभाजींनी.
पोर्तुगीजांच उभ राज्य संभाजी राजांनी पार उध्वस्त केल.
कधी हरला नाही...
माग फिरला नाही...
तह केला नाही...
नमला नाही...
झुकला नाही...
वाकला नाही... अजिबात नाही...
जो झेपावत राहिला अति उत्साहान..
अफाट ताकतीन..
प्रचंड शौर्यान..
आपण शिवछत्रपतींचे पुत्र आहोत याचा धारणेन..
जगवत राहिला स्वराज्य... संवर्धित करत राहिला स्वराज्य... अफाट ताकतीन..
अरे एवढंच नाही कर्नाटकात गेलेत.
कर्नाटक मुठीत घेतलय. तंजावर पर्यंत मराठी राज्याच्या सीमा भिडविल्या. त्रीवेन्दिरम, त्रीचीनापल्ली, कावेरी नदी ओलांडलीये, तो पाशानकोट जिंकलाय, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मद्रास कुठवर कुठवर झेप मारली या सर्जा संभाजींनी.
कधी रायगड, कधी पन्हाळा, कधी गोवा, कधी जंजिरा, कधी त्रीचीनापल्ली, कधी पाशानकोट. अरे वाऱ्यासारखा फिरतोय नुसता. दिवसाच्या २४ तासांपैकी २० तास घोड्यावर मांड टाकून लढायचा. प्रसंगी शाडूच्या मातीच्या भाकरी खायचा. पण मराठी राज्यासाठी अफाट ताकतीन झुंजत राहायचा.
“अरे तलवारीच्या टोकावर मरण घेऊन हिंडतात मराठे. औरंगजेबा तुला मारायला वक्त नाही लागणार.
आई भवानीचे राज्य हे, नको हात घालूस.
” गर्जत राहिला... बरसत राहिला... संभाजी राजा.

किल्ले प्रतापगड

किल्ले प्रतापगड
प्रतापगडाचे सौंदर्य वीजवाहिन्यांनी झाकोळले __
जावली म्हणजेच जयवल्ली. 'येता जावली जाता गोवळी' म्हणून मिरवली गेलेली चंद्रराव उपाधी धारण करणार्‍या मोर्‍यांची राजधानी. शिवरायांनी ज्याचा बिमोड केला, जावळी जिंकून स्वराज्याचा विस्तार केला. प्रतापगडची लढाई ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वांत रोमांचकारी घटना मानली जाते. याच गडाच्या पायथ्याला अफजल खानाचा वध करून शिवरायांनी स्वराज्याचा विस्तार केला. अशा या छत्रपतींच्या अतुलनीय पराक्रमाची साक्ष देणार्‍या प्रतापगडाचे सौंदर्य वीजवाहिन्यांच्या जाळ्यात झाकोळले आहे.
दरवर्षी लाखोंच्या सख्येने पर्यटक व शालेय सहली प्रतापगडला भेट देतात. गडावर जाण्यासाठी रस्ता अरुंद असल्यामुळे तारेवरची कसरत करावी लागते. अवघे चार किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी चार तास लागतात. वाडा-कुंभरोशी ते प्रतापगड हा रस्ता १९५७ मध्ये बनविण्यात आला होता. त्यावेळी आतासारखी वाहतूक नव्हती. परंतु आता परिस्थिती बदलली आहे. रस्ता रुंदीकरणाची गरज आहे. यासाठी २०१३ मध्ये ४ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. मात्र, अद्याप कामास सुरुवात नाही.
प्रतापगडावर १६६१ मध्ये मोरोपंत पिंगळे यांच्या हस्ते भवानी मातेच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. राज्याभिषेकापूर्वी शिवराय भवानीच्या दर्शनासाठी आले. १९ मे १६७४ रोजी त्यांनी ५६ हजारांचे सुवर्णछत्र अर्पण केले होते. किल्ल्यावर पश्‍चिम भागात कडेलोट पाईंट आहे. तेथून रायगड जिल्ह्यातील खेडी दिसतात. ध्वजा बुरुज, तलावाचा बुरुज, अफजल खान बुरुज, रेडका बुरुज,, यशवंत बुरुज, केदारेश्‍वर मंदिर, हनुमान मंदिर, चोरवाटा, दरबारी जागा, पाण्याची तळी हे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते.
प्रतापगडावर डागडुजी करण्यासाठी शासनाकडून १२ कोटी ५० लाख रुपये मंजूर झाले आहेत. हे बांधकाम चार टप्प्यांत पूर्ण करावयाचे आहे. डागडुजी करण्याचे काम बांधकाम विभागाकडे आहे. यांच्याकडून देण्यात आलेल्या ठेकेदाराने दोन वर्षांत २५ टक्क्यांपेक्षाही कमी काम केले आहे. बांधकाम विभागाने योग्य ठेकेदार दिला नाही, अशी नाराजी शिवप्रेमींमधून व्यक्त होत आहे.
बांधकामात चुन्याचा वापर करायचा आहे. मात्र, कारागीर नसल्याने हे बांधकाम बंद पडले आहे. कर्नाटक व गुलबर्गा या भागातील माहीतगार कुशल कारागीरच हे काम करू शकतात. गडाचे काम अर्धवट अवस्थेत बंद पडल्यामुळे ध्वजा बुरुजाकडे जाताना पर्यटकांना मोठय़ा दगडांचे अडथळे पार करून पुढे जावे लागत आहे. त्यामुळे पर्यटकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
किल्ल्याला एकूण ४५० पायर्‍या आहेत. भवानी मातेच्या मंदिराच्या परिसरातून शिवरायांच्या पुतळ्याकडे जाताना या पायर्‍या निसटलेल्या अवस्थेत असल्यामुळे पडण्याची शक्यता आहे. पूर्वीप्रमाणेच काळ्या दगडाच्या पायर्‍या असाव्यात, अशी मागणी होत आहे. किल्ल्याच्या परिसरात वीजवाहिन्या सर्वत्र झाल्यामुळे किल्ल्याचे निसर्गसौंदर्य झाकोळले आहे. वीजवाहिन्या जमिनीतून न्याव्यात, अशीही मागणी होत आहे.
प्रतापगड हे प्रेक्षणीय स्थळ म्हणून येथे नेहमीच विद्यार्थी, पर्यटकांची गर्दी असते. वाहनतळापासून शिवरायांच्या पुतळ्यापर्यंतच्या अंतरात एकच शौचालय आहे. याकडेही देणे गरजेचे असल्याचे पर्यटक, शिवप्रेमींमधून बोलले जात आहे. गडाच्या पायथ्याला असलेल्या वाहनतळावर शंभर ते दीडशे वाहने उभी राहू शकतात. मात्र, पर्यटकांचा हंगाम असेल त्यावेळी गडावर तीनशे ते चारशे वाहने दाखल होतात. त्यावेळी मोठी अडचण निर्माण होते. वाहनतळाची जागा ही वनविभागाकडे असल्याने येथे वाहन तळ वाढविण्यास जागा मिळत नाही.
■ प्रतापगडावर तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते १९५७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारुढ पुतळा उभारण्यात आला.
■ त्यानंतर वनविभागाने पुतळा परिसरात बागबगीचा तयार करून सुशोभीकरण करण्यात आले आहे.

रौद्रशंभू

रौद्रशंभू
भीमा इंद्रायणी तिरी
वढु-तुळा संगामावरी
म्रुत्यंजय संभाजी पाहुनं म्रुत्युही थिजला..
बाळ इथे निजला शिवाचा
बाळ इथे निजला...ll
संभाजी राजा वाघासम आले
संभाजी राजा शिवबासम जगले
संभाजी राजा सिंहासम गेले
संभाजी राजा जगी अमर झाले..
मरण आले तरी शरण ना कधी
स्वार्थाने लाचार ना कधी
जीवन गेले रणांगणी
हार ना मानली कधी..
दुखसिंधु करुणी पार
मांडुन शिवमय हा जागर
पराक्रमाचा सागर
झाला करुणेचा आगर
दगडाचा सह्याद्री आता अश्रुंनी भिजला..
बाळ इथे निजला शिवाचा
बाळ इथे निजला...ll

किल्ले तोरणागड

*** किल्ले तोरणागड **************
***किल्ल्याची उंची :- १४०० मीटर.. किल्ल्याचा प्रकार :- गिरीदुर्ग डोंगररांग :- पुणे.श्रेणी :- मध्यम
शिवाजी महराजांनी सुरवातीच्या काळात जे काही किल्ले घेतले त्यापैकी एक किल्ला तोरणा . गडावर तोरण जातीची पुष्कळ झाडी असल्यामुळे गडाचे नाव पडले तोरणा . महाराजांनी गडाची पाहणी करताना याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे "प्रचंडगड " असे नाव ठेवले . पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सहयाद्रीच्या रांगेतून दोन पदर निघून पूर्वेला पसरत गेले आहेत. यापैकी पहिल्या पदरावर तोरणा व राजगड वसलेले आहेत तर दुसर्या पदराला भुलेश्वर रांग म्हणतात. पुण्याच्या नैऋत्येस असलेल्या पर्वतराजी मध्ये उत्तर अक्षांश व पूर्व रेखांशावर हा किल्ला आहे . याच्या दक्षिणेला वेळवंडी नदी व उत्तरेला कानद नदीचे खोरे आहे. गडाच्या पशिमेला कानद खिंड , पूर्वेला बामण व खरीव खिंडी आहेत .
इतिहास :- हा किल्ला कधी आणि कुणी बांधला याचा पुरावा आज उपलब्ध नाही .येथील लेण्याच्या अन मंदिराच्या अवशेषावरून हा शैवपंथाचा आश्रम असावा इसवी सन १४७० ते १४८६ च्या दरम्यान बहमनी राजवटीसाठी मलिक अहमद याने हा किल्ला जिंकला . पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला. नंतर तो महाराजांनी घेतला व याचे नाव प्रचंडगड ठेवले . गडावर काही इमारती बांधल्या . राजांनी आग्र्याहून आल्यावर अनेक गडाचा जीर्णोद्धार केला . त्यात ५००० होन इतका खर्च त्यांनी तोरण्यावर केला. संभाजी महाराजाचा वाद झाल्यावर हा किल्ला मोगलाकडे गेला.शंकराजी नारायण सचिवानी तो परत मराठ्यांच्या ताब्यात आणला. पुढे इसवी सन १७०४ मध्ये औरंगजेबाने याला वेढा घातला व लढाई करून आपल्या ताब्यात आणला व याचे नाव फुतुउल्गैब म्हणजे दैवी विजय ठेवले . पण परत चार वर्षांनी सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर लोक चढवून गड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला व यानंतर तोरणा कायम स्वराज्यातच राहिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये तोरणा हा महाराजाकडेच राहिला . विशेष म्हणजे औरंगजेब बादशहाने लढाई करून जिंकलेला असा हा मराठ्यांचा एकमेव किल्ला होय.
गडावरील पाहण्यासारखे ठिकाण :- .
गडावर जाण्याच्या वाटा :- कठीण -राजगड - तोरणा मार्गे
राहण्याची सोय :-गडावरील मेंगाई देवीच्या मंदिरात १० ते १५ जनाची राहण्याची सोय होते .
जेवणाची सोय :- आपण स्वताच करावी .
पाण्याची सोय :- .मेंगाई देवीच्या मंदिराच्या समोरच बारमाही पाण्याचे टाके आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :-अडीच तास वेल्हेमार्गे , ६ तास राजगड-तोरणा मार्गे .

जय रौद्र शंभो

इथेच घात झाला … माझा शंभु राजा गनिमांच्या तावडित सापडला
संगमेश्वर -
इ.स. १६८९च्या सुरवातीला संभाजीराजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे बोलावले. १ फेब्रुवारी, इ.स. १६८९ रोजी बैठक संपवून संभाजीराजे रायगडाकडे रवाना होत असतानाच त्यांचा मेहुणा गणोजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान यांनी संगमेश्वरावर हल्ला केला. या कारवाईसाठी गणोजी शिर्क्याने कमालीची गुप्तता बाळगली आणि सर्व कारवाईची आखणी खूपच काळजीपूर्वक केली. मराठयांत आणि शत्रूचे सैन्यात चकमक झाली. मराठयांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्‍नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. शत्रूने संभाजीराजांना व त्यांच्यासोबत असलेल्या कवि कलश यांना जिवंत पकडले.
त्यानंतर संभाजीराजे आणि त्यांचे सल्लागार कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादुरगड, आता धर्मवीरगड येथे आणण्यात आले. औरंगजेबाने संभाजीराजांना सर्व किल्ले त्याच्या स्वाधीन करून धर्मांतर केल्यास जीवदान देण्याचे मान्य केले. पण संभाजीराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. औरंगजेबाने संभाजीराजे आणि कवी कलश यांची विदूषकाचे कपडे घालून अत्यंत मानहानीकारक अशी धिंड काढण्यात आली. तरीही संभाजीराजांनी शरणागती पत्करण्यास नकार दिला. तेव्हा औरंगजेबाने त्यांना क्रूरपणे अत्यंत हालहाल करून ठार मारायचा आदेश दिला. सुमारे ४० दिवसांपर्यंत असह्य यातना सहन करूनही संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही.
बहादुरगडावर (मौजे पेडगाव, ता.श्रीगोंदा) संभाजी महाराजांची धिंड काढलेली होती. एका बोडक्या घाणेरड्या उंटावर संभाजी महाराजांना व कवि कलशांना उलटे बसवले होते. साखळदंडाने बांधलेले. त्या दोघांच्या अंगावर विदूषकासारखे झिरमिळ्यांचे चट्ट्यापट्टयाचे कपडे चढवलेले होते. गळ्यातील शिवरायांनी चढवलेली कवड्याची माळ उतरवून गुरांनाही सहन होणार नाही अशी काथ्याची पेंढी बांधलेली होती. दोघांच्याही डोक्यावर एखाद्या अट्टल गुन्हेगारांना बांधाव्यात अशा, कुराणमध्ये सांगितलेल्या आदेशानुसार इराणी लाकडी टोप्या बसवलेल्या होत्या. त्याच प्रमाणे 'तख्तेकुलाह' म्हणजे लाकडी फळ्यांचा खोडा मानेवर ठेवून त्याला दोन्ही हात बांधलेले होते. त्या खोड्याला घुंगरे बांधलेली होती अन् त्यावर छोटी छोटी निशाणे चितारलेली होती. .
पुढे औरंगजेबाने आपला मुक्काम तुळापूर येथे हालवला. इथे तुळापूरच्या संगमावर हलाल करावयाचे होते. संभाजी महाराजांची तेजस्वी नेत्रकमले काढण्यासाठी हशम सरसावले. रांजणातून रवी जशी फिरवावी, तशा त्या तप्त - लालजर्द सळया शंभू राजांच्या डोळ्यातून फिरल्या. चर्र चर्र आवाज करीत चर्येवरील कातडी होरपळून गेली. सारी छावणी थरारली पण संभाजी महाराजांच्या मुखातून आक्रोशाची लकेरही उमटली नाही. यामुळे औरंगजेबाचा पारा मात्र जास्तच चढला. कवि कलशाचेही डोळे काढण्यात आले.
संभाजी महाराजाना पुढील शिक्षा होती जबान काटायची. औरंगजेबाची तशी आज्ञा होती. दोन हबशी पुढे सरसावले, पण संभाजी राजांचा जबडा काही उखडेना. अरे कसा उघडेल वाघाचा जबडा आहे, शेवटी हबशींनी नाक दाबले तसे श्वासासाठी संभाजींचे तोंड उघडले तोच त्यांच्या तोंडात पक्कड घुसविली गेली. त्या पकडीत त्यांची जीभ पकडली गेली, व तलवारीच्या वाराने ती कापली गेली.
ही हत्या मार्च ११, इ.स. १६८९ रोजी भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावरील आळंदीजवळच्या तुळापूर येथे करण्यात आली.
-- जय रौद्र शंभो--
भीमा इंद्रायणी तिरी
वढु-तुळा संगामावरी
म्रुत्यंजय संभाजी पाहुनं
म्रुत्युही थिजला..
बाळ इथे निजला शिवाचा
बाळ इथे निजला...ll

सुवर्णदुर्ग किल्ला

सुवर्णदुर्ग किल्ला
इ.स.१६६० मध्ये महाराजांनी सुवर्णदुर्ग किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला आणि किल्ल्याची डागडुजी केली.दर्याराजे कान्होजी आंग्रे यांनी सुवर्णदुर्गाच्या बळावर सागरावर आपले वर्चस्व गाजविले.सुवर्णदुर्ग हा जलदुर्ग हर्णेच्या बंदराजवळ वसलेला आहे.
किल्ल्याच्या महाद्वाराजवळ पायरीवर कासवाचं शिल्प आहे, तर उजव्या बाजूला तटबंदीवर हनुमानाची मुर्ती कोरलेली आहे. प्रवेशद्वाराच्या आत पहारेकराच्या दोन देवड्या आहेत. सुवर्णदुर्गाच्या आत विहिरी तसेच पडझड झालेले वाड्याचे अवशेष आहेत.
गडावरची तटबंदी आजही मजबूत अवस्थेत उभी आहे.गडावर एकून सात विहिरी आहेत.सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या रक्षणासाठी हर्णेच्या किनार्‍यावर आणखी तीन सागरी दुर्गांची उभारणी करण्यात आलेली आहे,ते तीन दुर्ग म्हणजे कनकदुर्ग,फत्तेदुर्ग आणि गोवागड.सुवर्ण दुर्गाच्या किनाऱ्यावर या दुर्गाचे दर्शन होते.एका तासात किल्ला पाहून होतो.
गडावर जाण्या-येण्याची तसेच राहण्या-खाण्याची व्यवस्था
मुंबई-गोवा महामार्गावर खेड ला उतरावे.तेथून दापोलीहून हर्णला.हर्णे बंदरातून,होडीतून सुवर्णदुर्गावर जाण्यासाठी साधारण २० मिनिटं लागतात.
गडावर राहण्याची तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही,जेवणाची व्यवस्था स्वत: करावी.