Monday 12 January 2015

घरात चांगले संस्कार व्हावे

घरात चांगले संस्कार व्हावे असे मी वारंवार सांगत असतो कारण जिवनात तेच सगळ्यात महत्वाचे असते. स्वराज्य हे एका दिवसात तयार झाले नाही.शहाजी राजांनी कित्येक दिवस उराशी स्वप्न बाळगले ते साकार होण्यासाठी शिवाजी राजांना तसे घडवले.उदा:बार मावळ एकत्र करणारे कान्होजी जेधे,शिवरायांचे गुरु बाजी पासलकर आदी शहाजी राजांच्या सेवेत असणारी मंडळी त्यांनी शिवबाच्या दिमतीस पुण्यास धाडुन दिली.
तोरणा किल्ल्यावर धनाचे सात हंडे सापडले ही कथा आपण ऐकतो.पण हे हंडे सापडणे हा योगायोग न्हवता.सोनाजी डबीर यांच्या मार्फ़त शहाजी राजांनी खेळलेले ते राजकारण होते.पुढे शिवछत्रपतिंनी संभाजी राजांना घडवताना योग्य ते संस्कार केले म्हणुन एका सिंहाच्या पोटी छावा तयार झाला. आग्र्याहुन सुटकेची ब्लु प्रिंट संभाजी राजांनी तयार केली वयाच्या नवव्या वर्षी. असे मानन्यास पुरावे आहेत कारण शिवाजी राजे महालातुन बाहेर जाऊ शकत न्हवते जाउ शकत होता तो छोटा संभाजी.या छोट्या संभाजीने कुठुन कसे जायचे,कुठल्या दिशेला जायचे याचा आराखडा राजांना सादर केला.
शिवाजी राजांना दुभाष्याची गरज पडत असे परंतु संभाजी राजे १६ भाषा बोलत असत.त्याकाळातील इंग्रज गवर्नर यामुळे आश्चर्य चकित झाले तसे त्यांनी आपल्या डायरित नमुद करुन ठेवले आहे.संभाजी राजांना कलेतसुद्धा फ़ार रस होता,भरतनाट्यम, कथकली आदी त्याकाळात लोप पावु शकणाऱ्या कलांना नवसंजिवनी दिली ती संभाजी राजांनी,तत्कालि न स्वराज्य बेंगरुळु आदीपर्यंत होते हे लक्षात घ्यावे.
शिवछत्रपतिंनी त्या त्या कलेतील जाणकार मंडळींकडुन संभाजी राजांना ज्ञान मिळण्याची व्यवस्था केली.
जगातिल पहिले बुलेटप्रुफ़ जॅकेट संभाजी राजांनी त्रीचीनापल्लीचा चीक्क्देव राजाचा किल्ला घेताना तयार केले.कातड्यापास ुन तयार केलेल्या चिलखतावर तेल चोपडले ज्यामुळे शत्रु सैन्याच्या बाणांचा मारा निष्फ़ळ ठरला.ही युद्धकला,राजकार ण संभाजीराजांनी"बुधभुषणम"या ग्रंथात वयाच्या १४ वर्षी लिहिली.
काशीचे धर्ममार्तंड"गागाभट्ट"यांनी लिहिलेला"राज्याभिषेक"हा ग्रंथ १४ वर्षांच्या संभाजीला गुरु मानुन अर्पण केला.म्हणजे अखिल मराठी साम्राज्यात त्यांना अर्पण करावासा वाटलेला एकमेव पडीत संभाजी महाराज होते म्हणजे संभाजी राजांचे पांडित्य किती असेल?
पण इथे सर्व मुळ काय आहे तर शहाजी ते संभाजी वगैरे पर्यंत सर्वांनी लक्षपुर्वक धेय समोर ठेवुन घडण केली.तुम्ही तुमच्या मुलांना काय संस्कार देताय हे महत्वाचे आहे.त्यामुळे खुप सारी पैशाची डबोली तुम्ही ठेव शकाल परंतु संस्कार मात्र तुम्हालाच द्यावे लागतील ते विकत मिळणार नाहित एवढं लक्षात असु द्या.

No comments:

Post a Comment