Friday, 2 January 2015

संभाजी राजा

औरंगजेब थयथया नाचवलाय ...
पोर्तुगीज वाकवलाय ...
इंग्रज झुकवलाय ...
सिद्दी पार अडवा केलाय ...
एक नाही दोन नाही पाब्बर १२ घोडांवर निकराचे पंजेफाड करत सेना धुरंदर सर्जा संभाजी अजिंक्यच राहिलाय.
गोव्यावर हल्ला केला. पार मांडवी नदी तुडवून संभाजी राजे गोव्यात घुसणार. तो व्हाईसराय पार पार वैतागला. गोवा हि राजधानी सोडून त्याने दुसरीकडे राजधानी बनवण्याचा डावही मांडला.
इंग्रजांशी तह केला.
इंग्रजांची मस्ती पुरती जिरवली. सरळ केजरी नावाच्या गवर्नरला सांगितल,
“मुंबई विकत दे आणि चल चालू पड”.
अरे जर संभाजी राजांनी त्यावेळी तहात मुंबई विकत घेतली असती ना, तर १५० वर्ष इंग्रजांचे पाय आमच्या छाताडावर नाचालेच नसते. इंग्रजांचा धोका ओळखला होता ना तो या सर्जा सभाजींनी.
पोर्तुगीजांच उभ राज्य संभाजी राजांनी पार उध्वस्त केल.
कधी हरला नाही...
माग फिरला नाही...
तह केला नाही...
नमला नाही...
झुकला नाही...
वाकला नाही... अजिबात नाही...
जो झेपावत राहिला अति उत्साहान..
अफाट ताकतीन..
प्रचंड शौर्यान..
आपण शिवछत्रपतींचे पुत्र आहोत याचा धारणेन..
जगवत राहिला स्वराज्य... संवर्धित करत राहिला स्वराज्य... अफाट ताकतीन..
अरे एवढंच नाही कर्नाटकात गेलेत.
कर्नाटक मुठीत घेतलय. तंजावर पर्यंत मराठी राज्याच्या सीमा भिडविल्या. त्रीवेन्दिरम, त्रीचीनापल्ली, कावेरी नदी ओलांडलीये, तो पाशानकोट जिंकलाय, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मद्रास कुठवर कुठवर झेप मारली या सर्जा संभाजींनी.
कधी रायगड, कधी पन्हाळा, कधी गोवा, कधी जंजिरा, कधी त्रीचीनापल्ली, कधी पाशानकोट. अरे वाऱ्यासारखा फिरतोय नुसता. दिवसाच्या २४ तासांपैकी २० तास घोड्यावर मांड टाकून लढायचा. प्रसंगी शाडूच्या मातीच्या भाकरी खायचा. पण मराठी राज्यासाठी अफाट ताकतीन झुंजत राहायचा.
“अरे तलवारीच्या टोकावर मरण घेऊन हिंडतात मराठे. औरंगजेबा तुला मारायला वक्त नाही लागणार.
आई भवानीचे राज्य हे, नको हात घालूस.
” गर्जत राहिला... बरसत राहिला... संभाजी राजा.

किल्ले प्रतापगड

किल्ले प्रतापगड
प्रतापगडाचे सौंदर्य वीजवाहिन्यांनी झाकोळले __
जावली म्हणजेच जयवल्ली. 'येता जावली जाता गोवळी' म्हणून मिरवली गेलेली चंद्रराव उपाधी धारण करणार्‍या मोर्‍यांची राजधानी. शिवरायांनी ज्याचा बिमोड केला, जावळी जिंकून स्वराज्याचा विस्तार केला. प्रतापगडची लढाई ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वांत रोमांचकारी घटना मानली जाते. याच गडाच्या पायथ्याला अफजल खानाचा वध करून शिवरायांनी स्वराज्याचा विस्तार केला. अशा या छत्रपतींच्या अतुलनीय पराक्रमाची साक्ष देणार्‍या प्रतापगडाचे सौंदर्य वीजवाहिन्यांच्या जाळ्यात झाकोळले आहे.
दरवर्षी लाखोंच्या सख्येने पर्यटक व शालेय सहली प्रतापगडला भेट देतात. गडावर जाण्यासाठी रस्ता अरुंद असल्यामुळे तारेवरची कसरत करावी लागते. अवघे चार किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी चार तास लागतात. वाडा-कुंभरोशी ते प्रतापगड हा रस्ता १९५७ मध्ये बनविण्यात आला होता. त्यावेळी आतासारखी वाहतूक नव्हती. परंतु आता परिस्थिती बदलली आहे. रस्ता रुंदीकरणाची गरज आहे. यासाठी २०१३ मध्ये ४ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. मात्र, अद्याप कामास सुरुवात नाही.
प्रतापगडावर १६६१ मध्ये मोरोपंत पिंगळे यांच्या हस्ते भवानी मातेच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. राज्याभिषेकापूर्वी शिवराय भवानीच्या दर्शनासाठी आले. १९ मे १६७४ रोजी त्यांनी ५६ हजारांचे सुवर्णछत्र अर्पण केले होते. किल्ल्यावर पश्‍चिम भागात कडेलोट पाईंट आहे. तेथून रायगड जिल्ह्यातील खेडी दिसतात. ध्वजा बुरुज, तलावाचा बुरुज, अफजल खान बुरुज, रेडका बुरुज,, यशवंत बुरुज, केदारेश्‍वर मंदिर, हनुमान मंदिर, चोरवाटा, दरबारी जागा, पाण्याची तळी हे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते.
प्रतापगडावर डागडुजी करण्यासाठी शासनाकडून १२ कोटी ५० लाख रुपये मंजूर झाले आहेत. हे बांधकाम चार टप्प्यांत पूर्ण करावयाचे आहे. डागडुजी करण्याचे काम बांधकाम विभागाकडे आहे. यांच्याकडून देण्यात आलेल्या ठेकेदाराने दोन वर्षांत २५ टक्क्यांपेक्षाही कमी काम केले आहे. बांधकाम विभागाने योग्य ठेकेदार दिला नाही, अशी नाराजी शिवप्रेमींमधून व्यक्त होत आहे.
बांधकामात चुन्याचा वापर करायचा आहे. मात्र, कारागीर नसल्याने हे बांधकाम बंद पडले आहे. कर्नाटक व गुलबर्गा या भागातील माहीतगार कुशल कारागीरच हे काम करू शकतात. गडाचे काम अर्धवट अवस्थेत बंद पडल्यामुळे ध्वजा बुरुजाकडे जाताना पर्यटकांना मोठय़ा दगडांचे अडथळे पार करून पुढे जावे लागत आहे. त्यामुळे पर्यटकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
किल्ल्याला एकूण ४५० पायर्‍या आहेत. भवानी मातेच्या मंदिराच्या परिसरातून शिवरायांच्या पुतळ्याकडे जाताना या पायर्‍या निसटलेल्या अवस्थेत असल्यामुळे पडण्याची शक्यता आहे. पूर्वीप्रमाणेच काळ्या दगडाच्या पायर्‍या असाव्यात, अशी मागणी होत आहे. किल्ल्याच्या परिसरात वीजवाहिन्या सर्वत्र झाल्यामुळे किल्ल्याचे निसर्गसौंदर्य झाकोळले आहे. वीजवाहिन्या जमिनीतून न्याव्यात, अशीही मागणी होत आहे.
प्रतापगड हे प्रेक्षणीय स्थळ म्हणून येथे नेहमीच विद्यार्थी, पर्यटकांची गर्दी असते. वाहनतळापासून शिवरायांच्या पुतळ्यापर्यंतच्या अंतरात एकच शौचालय आहे. याकडेही देणे गरजेचे असल्याचे पर्यटक, शिवप्रेमींमधून बोलले जात आहे. गडाच्या पायथ्याला असलेल्या वाहनतळावर शंभर ते दीडशे वाहने उभी राहू शकतात. मात्र, पर्यटकांचा हंगाम असेल त्यावेळी गडावर तीनशे ते चारशे वाहने दाखल होतात. त्यावेळी मोठी अडचण निर्माण होते. वाहनतळाची जागा ही वनविभागाकडे असल्याने येथे वाहन तळ वाढविण्यास जागा मिळत नाही.
■ प्रतापगडावर तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते १९५७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारुढ पुतळा उभारण्यात आला.
■ त्यानंतर वनविभागाने पुतळा परिसरात बागबगीचा तयार करून सुशोभीकरण करण्यात आले आहे.

रौद्रशंभू

रौद्रशंभू
भीमा इंद्रायणी तिरी
वढु-तुळा संगामावरी
म्रुत्यंजय संभाजी पाहुनं म्रुत्युही थिजला..
बाळ इथे निजला शिवाचा
बाळ इथे निजला...ll
संभाजी राजा वाघासम आले
संभाजी राजा शिवबासम जगले
संभाजी राजा सिंहासम गेले
संभाजी राजा जगी अमर झाले..
मरण आले तरी शरण ना कधी
स्वार्थाने लाचार ना कधी
जीवन गेले रणांगणी
हार ना मानली कधी..
दुखसिंधु करुणी पार
मांडुन शिवमय हा जागर
पराक्रमाचा सागर
झाला करुणेचा आगर
दगडाचा सह्याद्री आता अश्रुंनी भिजला..
बाळ इथे निजला शिवाचा
बाळ इथे निजला...ll

किल्ले तोरणागड

*** किल्ले तोरणागड **************
***किल्ल्याची उंची :- १४०० मीटर.. किल्ल्याचा प्रकार :- गिरीदुर्ग डोंगररांग :- पुणे.श्रेणी :- मध्यम
शिवाजी महराजांनी सुरवातीच्या काळात जे काही किल्ले घेतले त्यापैकी एक किल्ला तोरणा . गडावर तोरण जातीची पुष्कळ झाडी असल्यामुळे गडाचे नाव पडले तोरणा . महाराजांनी गडाची पाहणी करताना याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे "प्रचंडगड " असे नाव ठेवले . पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सहयाद्रीच्या रांगेतून दोन पदर निघून पूर्वेला पसरत गेले आहेत. यापैकी पहिल्या पदरावर तोरणा व राजगड वसलेले आहेत तर दुसर्या पदराला भुलेश्वर रांग म्हणतात. पुण्याच्या नैऋत्येस असलेल्या पर्वतराजी मध्ये उत्तर अक्षांश व पूर्व रेखांशावर हा किल्ला आहे . याच्या दक्षिणेला वेळवंडी नदी व उत्तरेला कानद नदीचे खोरे आहे. गडाच्या पशिमेला कानद खिंड , पूर्वेला बामण व खरीव खिंडी आहेत .
इतिहास :- हा किल्ला कधी आणि कुणी बांधला याचा पुरावा आज उपलब्ध नाही .येथील लेण्याच्या अन मंदिराच्या अवशेषावरून हा शैवपंथाचा आश्रम असावा इसवी सन १४७० ते १४८६ च्या दरम्यान बहमनी राजवटीसाठी मलिक अहमद याने हा किल्ला जिंकला . पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला. नंतर तो महाराजांनी घेतला व याचे नाव प्रचंडगड ठेवले . गडावर काही इमारती बांधल्या . राजांनी आग्र्याहून आल्यावर अनेक गडाचा जीर्णोद्धार केला . त्यात ५००० होन इतका खर्च त्यांनी तोरण्यावर केला. संभाजी महाराजाचा वाद झाल्यावर हा किल्ला मोगलाकडे गेला.शंकराजी नारायण सचिवानी तो परत मराठ्यांच्या ताब्यात आणला. पुढे इसवी सन १७०४ मध्ये औरंगजेबाने याला वेढा घातला व लढाई करून आपल्या ताब्यात आणला व याचे नाव फुतुउल्गैब म्हणजे दैवी विजय ठेवले . पण परत चार वर्षांनी सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर लोक चढवून गड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला व यानंतर तोरणा कायम स्वराज्यातच राहिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये तोरणा हा महाराजाकडेच राहिला . विशेष म्हणजे औरंगजेब बादशहाने लढाई करून जिंकलेला असा हा मराठ्यांचा एकमेव किल्ला होय.
गडावरील पाहण्यासारखे ठिकाण :- .
गडावर जाण्याच्या वाटा :- कठीण -राजगड - तोरणा मार्गे
राहण्याची सोय :-गडावरील मेंगाई देवीच्या मंदिरात १० ते १५ जनाची राहण्याची सोय होते .
जेवणाची सोय :- आपण स्वताच करावी .
पाण्याची सोय :- .मेंगाई देवीच्या मंदिराच्या समोरच बारमाही पाण्याचे टाके आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :-अडीच तास वेल्हेमार्गे , ६ तास राजगड-तोरणा मार्गे .

जय रौद्र शंभो

इथेच घात झाला … माझा शंभु राजा गनिमांच्या तावडित सापडला
संगमेश्वर -
इ.स. १६८९च्या सुरवातीला संभाजीराजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे बोलावले. १ फेब्रुवारी, इ.स. १६८९ रोजी बैठक संपवून संभाजीराजे रायगडाकडे रवाना होत असतानाच त्यांचा मेहुणा गणोजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान यांनी संगमेश्वरावर हल्ला केला. या कारवाईसाठी गणोजी शिर्क्याने कमालीची गुप्तता बाळगली आणि सर्व कारवाईची आखणी खूपच काळजीपूर्वक केली. मराठयांत आणि शत्रूचे सैन्यात चकमक झाली. मराठयांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्‍नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. शत्रूने संभाजीराजांना व त्यांच्यासोबत असलेल्या कवि कलश यांना जिवंत पकडले.
त्यानंतर संभाजीराजे आणि त्यांचे सल्लागार कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादुरगड, आता धर्मवीरगड येथे आणण्यात आले. औरंगजेबाने संभाजीराजांना सर्व किल्ले त्याच्या स्वाधीन करून धर्मांतर केल्यास जीवदान देण्याचे मान्य केले. पण संभाजीराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. औरंगजेबाने संभाजीराजे आणि कवी कलश यांची विदूषकाचे कपडे घालून अत्यंत मानहानीकारक अशी धिंड काढण्यात आली. तरीही संभाजीराजांनी शरणागती पत्करण्यास नकार दिला. तेव्हा औरंगजेबाने त्यांना क्रूरपणे अत्यंत हालहाल करून ठार मारायचा आदेश दिला. सुमारे ४० दिवसांपर्यंत असह्य यातना सहन करूनही संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही.
बहादुरगडावर (मौजे पेडगाव, ता.श्रीगोंदा) संभाजी महाराजांची धिंड काढलेली होती. एका बोडक्या घाणेरड्या उंटावर संभाजी महाराजांना व कवि कलशांना उलटे बसवले होते. साखळदंडाने बांधलेले. त्या दोघांच्या अंगावर विदूषकासारखे झिरमिळ्यांचे चट्ट्यापट्टयाचे कपडे चढवलेले होते. गळ्यातील शिवरायांनी चढवलेली कवड्याची माळ उतरवून गुरांनाही सहन होणार नाही अशी काथ्याची पेंढी बांधलेली होती. दोघांच्याही डोक्यावर एखाद्या अट्टल गुन्हेगारांना बांधाव्यात अशा, कुराणमध्ये सांगितलेल्या आदेशानुसार इराणी लाकडी टोप्या बसवलेल्या होत्या. त्याच प्रमाणे 'तख्तेकुलाह' म्हणजे लाकडी फळ्यांचा खोडा मानेवर ठेवून त्याला दोन्ही हात बांधलेले होते. त्या खोड्याला घुंगरे बांधलेली होती अन् त्यावर छोटी छोटी निशाणे चितारलेली होती. .
पुढे औरंगजेबाने आपला मुक्काम तुळापूर येथे हालवला. इथे तुळापूरच्या संगमावर हलाल करावयाचे होते. संभाजी महाराजांची तेजस्वी नेत्रकमले काढण्यासाठी हशम सरसावले. रांजणातून रवी जशी फिरवावी, तशा त्या तप्त - लालजर्द सळया शंभू राजांच्या डोळ्यातून फिरल्या. चर्र चर्र आवाज करीत चर्येवरील कातडी होरपळून गेली. सारी छावणी थरारली पण संभाजी महाराजांच्या मुखातून आक्रोशाची लकेरही उमटली नाही. यामुळे औरंगजेबाचा पारा मात्र जास्तच चढला. कवि कलशाचेही डोळे काढण्यात आले.
संभाजी महाराजाना पुढील शिक्षा होती जबान काटायची. औरंगजेबाची तशी आज्ञा होती. दोन हबशी पुढे सरसावले, पण संभाजी राजांचा जबडा काही उखडेना. अरे कसा उघडेल वाघाचा जबडा आहे, शेवटी हबशींनी नाक दाबले तसे श्वासासाठी संभाजींचे तोंड उघडले तोच त्यांच्या तोंडात पक्कड घुसविली गेली. त्या पकडीत त्यांची जीभ पकडली गेली, व तलवारीच्या वाराने ती कापली गेली.
ही हत्या मार्च ११, इ.स. १६८९ रोजी भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावरील आळंदीजवळच्या तुळापूर येथे करण्यात आली.
-- जय रौद्र शंभो--
भीमा इंद्रायणी तिरी
वढु-तुळा संगामावरी
म्रुत्यंजय संभाजी पाहुनं
म्रुत्युही थिजला..
बाळ इथे निजला शिवाचा
बाळ इथे निजला...ll

सुवर्णदुर्ग किल्ला

सुवर्णदुर्ग किल्ला
इ.स.१६६० मध्ये महाराजांनी सुवर्णदुर्ग किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला आणि किल्ल्याची डागडुजी केली.दर्याराजे कान्होजी आंग्रे यांनी सुवर्णदुर्गाच्या बळावर सागरावर आपले वर्चस्व गाजविले.सुवर्णदुर्ग हा जलदुर्ग हर्णेच्या बंदराजवळ वसलेला आहे.
किल्ल्याच्या महाद्वाराजवळ पायरीवर कासवाचं शिल्प आहे, तर उजव्या बाजूला तटबंदीवर हनुमानाची मुर्ती कोरलेली आहे. प्रवेशद्वाराच्या आत पहारेकराच्या दोन देवड्या आहेत. सुवर्णदुर्गाच्या आत विहिरी तसेच पडझड झालेले वाड्याचे अवशेष आहेत.
गडावरची तटबंदी आजही मजबूत अवस्थेत उभी आहे.गडावर एकून सात विहिरी आहेत.सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या रक्षणासाठी हर्णेच्या किनार्‍यावर आणखी तीन सागरी दुर्गांची उभारणी करण्यात आलेली आहे,ते तीन दुर्ग म्हणजे कनकदुर्ग,फत्तेदुर्ग आणि गोवागड.सुवर्ण दुर्गाच्या किनाऱ्यावर या दुर्गाचे दर्शन होते.एका तासात किल्ला पाहून होतो.
गडावर जाण्या-येण्याची तसेच राहण्या-खाण्याची व्यवस्था
मुंबई-गोवा महामार्गावर खेड ला उतरावे.तेथून दापोलीहून हर्णला.हर्णे बंदरातून,होडीतून सुवर्णदुर्गावर जाण्यासाठी साधारण २० मिनिटं लागतात.
गडावर राहण्याची तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही,जेवणाची व्यवस्था स्वत: करावी.

प्राकृतिकदृष्टय़ा भारताचे विभाजन

प्राकृतिकदृष्टय़ा भारताचे विभाजन पुढील पाच प्रकारे करतात. १) उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश २) उत्तर भारतीय मदानी प्रदेश ३) भारतीय व्दिपकल्पीय पठारी प्रदेश ४) भारतीय किनारी मदानी प्रदेश ५) भारतीय बेटे. 
उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश : हिमालय, भारताच्या उत्तरेला हिमालय पर्वत आहे. सिंधू नदी व ब्रह्मपुत्रा नदीच्या घळ्यांदरम्यान हिमालयाच्या तीन समांतर पर्वतरांगा असून त्यांना बहिरवर्क आकार प्राप्त झाला आहे.
हिमालय पर्वताच्या रांगा : १) ट्रान्स हिमालय : ब्रहद् हिमालयाच्या उत्तरेस ट्रान्स हिमालयाच्या रांगा आहेत. ट्रान्स हिमालयाचा विस्तार 
पश्चिम - पूर्व दिशेने असून त्याची सरासरी लांबी १००० किमी इतकी आहे. ट्रान्स हिमालयात खालील रांगांचा समावेश होतो. अ) काराकोरम रांगा, ब) लडाख रांगा, क) कैलास रांगा.
अ) काराकोरम रांगा : भारतातील सर्वात उत्तरेला असलेल्या या रांगांमुळे भारताची अफगाणिस्तान आणि चीनसोबत सरहद्द निर्माण होते.
काराकोरमचा विस्तार पामीरपासून पूर्वेकडे गीलगिट नदीच्या पूर्वेला ८०० किमी. पर्यंत आहे. जगातील सर्वात उंचीचे २ नंबरचे आणि भारतीय सरहद्दीमधील सर्वात उंच शिखर के - २ ( गॉडविन ऑस्टीन) याच रांगेमध्ये आहे. जगातील काही मोठय़ा हिमनदीची निवासस्थाने या रांगेत आहेत. उदा. सियाचीन, बाल्टेरो, बायाफो, हिस्पर. काराकोरम रांगेत अतिशय उंच अशी शिखरे आहेत. काही शिखरांची उंची ८००० मी. पेक्षा जास्त आहे.
लडाख रांग : सिंधू नदी आणि तिची उपनदी श्योक यांच्यादरम्यान लडाख रांग आहे. लडाख रांगेची लांबी ३०० किमी आणि सरासरी उंची ५८०० मी. आहे.
कैलास रांग : लडाख रांगेची शाखा पश्चिम तिबेटमध्ये कैलास रांग या नावाने परिचित आहे. सर्वात उंच शिखर कैलास आहे.
बृहद् हिमालय (Greater Himalaya) : वैशिष्टय़े : १) लेसर हिमालयाच्या उत्तरेकडे भिंतीसारखे पसरलेले बृहद् हिमालयाची रांग आहे. बृहद् हिमालय हा मुख्य मध्यवर्ती प्रणोदामुळे (MCT-Maincentral Thrus) लेसर हिमालयापासून वेगळा झाला आहे. बृहद् हिमालयाचे महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे या रांगेत जगातील सर्वात उंच शिखरे आहेत. यातील बरीचशी शिखरे ही ८००० मी. पेक्षा जास्त आहे. या रांगेमध्ये जगातील सर्वात उंच शिखर मांऊट एव्हरेस्ट आहे. या रांगेतील अन्य शिखरे उतरत्या क्रमाने १) एव्हरेस्ट, २) कांचनगंगा, ३) मकालू, ४) धवलगिरी, ५) अन्नपूर्णा, ६) नंदा देवी, ७) कामेत, ८) नामच्या बरवा, ९) गुरला मंधता, १०) बद्रीनाथ
लेसर हिमालय/मध्य हिमालय ((Lesser or Middle Himalaya) : मध्य हिमालयालाच हिमाचल, हिमालया असे देखील संबोधले जाते. दक्षिणेकडील शिवालीक रांगा व उत्तरेकडील बृहद् हिमालय या दोघांना समांतर असा, लेसर हिमालय पसरलेला आहे. लेसर हिमालयाची रचना ही गुंतागुंतीची असून, या पर्वताची सरासरी उंची ३५०० ते ५००० मी. यांदरम्यान आहे. लेसर हिमालयात पुढील रांगांचा समावेश होतो.
१) पीरपंजाल, २) धौलाधर, ३) मसुरी व नागतिब्बा, ४) महाभारत
१) पीरपंजाल : काश्मीरमधील ही सर्वात लांब रांग असून हिचा विस्तार
झेलमपासून उध्र्व बियास नदीपर्यंत सुमारे ४०० किमीपर्यंतचा आहे. रावी नदीच्या आग्नेयकडे ही रांग पुढे धौलाधर म्हणून ओळखली जाते.
२) धौलाधर रांग : पीरपंजाल रांग पूर्वेकडे धौलाधर या नावाने प्रसिध्द आहे. ही रांग पुढे धर्मशाळा व सिमलामधून जाते.
३) मसुरी, नागतिब्बा रांग : लेसर हिमालयाच्या पूर्वेकडे जाताना फक्त काही रांगाच स्पष्टपणे ओळखल्या जातात. यांपकी मसुरी आणि नाग तिब्बा या रांगा आहेत.
४) महाभारत रांग : मसुरी रांग पुढे नेपाळमध्ये महाभारत रांग म्हणून ओळखली जाते.
महत्त्वाच्या खिंडी : पीरपंजाल, बिदिल खिंड, गोलाबघर खिंड, बनीहल खिंड
महत्त्वाची थंड हवेची ठिकाणे : लेसर हिमालयात सिमला (हिमाचल प्रदेश), मसुरी, राणीखेत, ननिताल, अल्मोडा ( उत्तराखंड), दार्जिलिंग 
( पं.बंगाल).
महत्त्वाच्या दऱ्या :
१) काश्मीर दरी : पीरपंजाल व मुख्य हिमालयाच्या झास्कर रांगेदरम्यान ही प्रसिध्द काश्मीर दरी आहे. काश्मीर दरीची लांबी सुमारे १३५ किमी तर रूंदी सुमारे ८० किमी इतकी आहे.
२) कांग्रा दरी : हिमाचल प्रदेशातील ही दरी धौलाधर रांगेच्या पायथ्यापासून बियास नदीच्या दक्षिण भागापर्यंत पोहोचलेली आहे.
३) कुलू दरी : रावी नदीच्या उध्र्व प्रवाहात कुलू दरी आहे. 
४) काठमांडू दरी : नेपाळमध्ये महाभारत रांगेच्या उत्तरेस काठमांडू दरी आहे.
शिवालीक रांगा / बाहय़ हिमालय (Outer Himalaya) : हिमालय पर्वताच्या सर्वात बाहेरील रांग ही शिवालीक रांग आहे. या रांगेलाच बाहय़ हिमालय असे म्हणतात. हिमालयाच्या इतर रांगेच्या उत्पत्तीनंतर शिवालीक टेकडय़ांची निर्मिती झाल्याने हिमालयातील नद्यांनी वाहून आणलेला गाळ या ठिकाणी साठत गेला व येथे सपाट मदानी प्रदेशाची निर्मिती झाली. यालाच डून ((Doon) असे म्हणतात उदा. डेहराडून (उत्तराखंड), उदमपूर व कोटला (जम्मू व काश्मीर)......